शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

यंदा गावरान आंब्याचा मिळणार गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची ...

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. परिसरातील आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटल्याने यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे.

तालुक्यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा, तर दुर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूर्वीची वनराई तोडून टाकली आहे. ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे आकाराने लहान व उंचीलादेखील कमी असतात. बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन आंब्याच्या जातीसह पुन्हा गावरान आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र काही सजक शेतकरी गावरान आंब्याची आमराई जिवापाड जोपासत त्यातून गावरान आंब्याचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमकास उत्पन्न होते. गावरान आंब्याच्या निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीमुळे पुन्हा गावरान आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला आला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या गोडवा व रसाळीची चव चाखण्यास मिळेल, असे वाटत आहे. सध्याचा मोहराचा दरवळणारा सुगंध सुखावणारा ठरत आहे.

बॉक्स...

निसर्गाची साथ हवी

गेल्या तीन-चार वर्षांत ऐन आंब्याच्या मोहर आलेला असताना वादळी वारे व गारपिटी झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडण्याचे प्रकार वाढलेले आहे. दरम्यान, हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंब्याचा मोहर गळून काळपट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. या समस्यांमुळे आंब्याच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत घट झालेली दिसून येत आहे. बिकट परिस्थितीत महत्त्वाचा आधार म्हणून आंबा पिकाकडे पहिले जाते. पंरतु मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याची परिस्थिती आहे.

बॉक्स..

आर्थिक आधार

तालुक्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. शिवाय बरेच शेतकरी आंब्याची ठोक विक्री न करता किरकोळ विक्री करतात. यात आंब्याला चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संमिश्र हवामानाचा परिणाम आंब्यावर झाल्याचे दिसून येत आहे.