शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

यंदा गावरान आंब्याचा मिळणार गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची ...

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. परिसरातील आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटल्याने यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे.

तालुक्यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा, तर दुर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूर्वीची वनराई तोडून टाकली आहे. ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे आकाराने लहान व उंचीलादेखील कमी असतात. बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन आंब्याच्या जातीसह पुन्हा गावरान आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र काही सजक शेतकरी गावरान आंब्याची आमराई जिवापाड जोपासत त्यातून गावरान आंब्याचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमकास उत्पन्न होते. गावरान आंब्याच्या निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीमुळे पुन्हा गावरान आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला आला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या गोडवा व रसाळीची चव चाखण्यास मिळेल, असे वाटत आहे. सध्याचा मोहराचा दरवळणारा सुगंध सुखावणारा ठरत आहे.

बॉक्स...

निसर्गाची साथ हवी

गेल्या तीन-चार वर्षांत ऐन आंब्याच्या मोहर आलेला असताना वादळी वारे व गारपिटी झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडण्याचे प्रकार वाढलेले आहे. दरम्यान, हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंब्याचा मोहर गळून काळपट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. या समस्यांमुळे आंब्याच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत घट झालेली दिसून येत आहे. बिकट परिस्थितीत महत्त्वाचा आधार म्हणून आंबा पिकाकडे पहिले जाते. पंरतु मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याची परिस्थिती आहे.

बॉक्स..

आर्थिक आधार

तालुक्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. शिवाय बरेच शेतकरी आंब्याची ठोक विक्री न करता किरकोळ विक्री करतात. यात आंब्याला चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संमिश्र हवामानाचा परिणाम आंब्यावर झाल्याचे दिसून येत आहे.