शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यंदा गावरान आंब्याचा मिळणार गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची ...

लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. परिसरातील आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटल्याने यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे.

तालुक्यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा, तर दुर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूर्वीची वनराई तोडून टाकली आहे. ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे आकाराने लहान व उंचीलादेखील कमी असतात. बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन आंब्याच्या जातीसह पुन्हा गावरान आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र काही सजक शेतकरी गावरान आंब्याची आमराई जिवापाड जोपासत त्यातून गावरान आंब्याचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमकास उत्पन्न होते. गावरान आंब्याच्या निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीमुळे पुन्हा गावरान आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला आला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या गोडवा व रसाळीची चव चाखण्यास मिळेल, असे वाटत आहे. सध्याचा मोहराचा दरवळणारा सुगंध सुखावणारा ठरत आहे.

बॉक्स...

निसर्गाची साथ हवी

गेल्या तीन-चार वर्षांत ऐन आंब्याच्या मोहर आलेला असताना वादळी वारे व गारपिटी झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडण्याचे प्रकार वाढलेले आहे. दरम्यान, हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंब्याचा मोहर गळून काळपट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. या समस्यांमुळे आंब्याच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत घट झालेली दिसून येत आहे. बिकट परिस्थितीत महत्त्वाचा आधार म्हणून आंबा पिकाकडे पहिले जाते. पंरतु मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याची परिस्थिती आहे.

बॉक्स..

आर्थिक आधार

तालुक्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. शिवाय बरेच शेतकरी आंब्याची ठोक विक्री न करता किरकोळ विक्री करतात. यात आंब्याला चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संमिश्र हवामानाचा परिणाम आंब्यावर झाल्याचे दिसून येत आहे.