शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आज जगाला आईन्स्टाईनच्या विचारांची गरज- विलास देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST

बुलडाणा : आज संपूर्ण जगालाच शांततेची गरज आहे़ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जागतिक पातळीवरील शांततेसाठी आणि अणुयुद्धाचा धोका टाळण्यासाठी ...

बुलडाणा : आज संपूर्ण जगालाच शांततेची गरज आहे़ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जागतिक पातळीवरील शांततेसाठी आणि अणुयुद्धाचा धोका टाळण्यासाठी जे महान कार्य केले आहे, त्याला इतिहासात तोड नाही. मानवतावादी विवेकी- वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईन याच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने जगाला गरज असल्याचे विचार भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांनी व्यक्त केले.

४ सप्टेंबरला भारत विद्यालयात संस्थापक कै. दिवाकरभय्या आगाशे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नोबेल पारितोषिक प्राप्त जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विद्यालयाचे मुख्य संचालक हर्षवर्धन आगाशे होते़ भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन याच्याविषयी माहिती दिली़

मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला़ संचालन रमेश इंगळे यांनी तर आभार शारदा एंडोले यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारत विद्यालय संस्थेच्या अध्यक्षा डॉ़ सीमा आगाशे, संचालक उदय देशपांडे, माजी मुख्याध्यापक बी.टी. कुसुंबे, रमेश वानखेडे, रविंद्र इंगळे, शैलाताई मोहिते,नारायण शिब्रे, गजानन एंडोले, गजानन कुळकर्णी, मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गजानन इंगळे, भारत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांच्यासह भारत विद्यालयातील शिक्षक-कर्मचारी उपस्थित हाेते़