शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

हवामान बदल आणि नव्या धोक्यांवर काम- विश्वास सुपनेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 15:02 IST

बुलडाणा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हवामान बदलामुळे कृषी, आरोग्यासह सर्वच क्षेत्रात काही नवीन धोके उभे राहत आहे. त्यामध्ये नुकसानाची तीव्रता कमी करण्यासोबतच अशा स्थितीशी कसे जुळवून घ्यावे, तसेच दिव्यांगांनाही आपत्ती काळात काळात कशी मदत करता येईल आणि समाजात त्याबाबत जागरुखता कशी निर्माण होईल, या दृष्टीने यशदाचा आपत्ती व्यवस्तापन विभाग आगामी काळात काम करणार असल्याचे या विभागाचे संचालक विश्वास सुपनेकर यांनी सांगितले. बुलडाणा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी ‘लोकमत’शी बोताना त्यांनी ही माहिती दिली.

शालेय सुरक्षा आराखड्याबाबत सध्याची स्थिती काय?शालेय सुरक्षा आराखडा महत्त्वाचा आहे. राज्यातील सुमारे तीन हजार शाळांचे सुरक्षा आराखडे तयार झाले आहेत. मुलांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव जागृती निर्माण वहावी यासाठी गेल्या दोन वर्षात आपण प्रयत्न केले. आपत्ती व्यवस्थापनात मुलांचा सहभाग आणि त्यांचे ज्ञान वाढावे हा दृष्टीकोण यात आहे.

नॅशनल सायकक्लोन रिस्क मेटीगेशन प्रोग्राम काय आहे?दोन वर्षापूर्वी नॅशनल सायकक्लोन रिस्क मेटीगेशन प्रोजेक्ट अंतर्गत पोलिस, आरोग्य, ग्रामविकास, शहरी विकास विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यांचा आपसी सबंध आहे. मात्र काही कारणास्तव तो बंद पडा. यात आरोग्य विभागात मोठे काम करता आले. दरम्यान, आता शालेय सुरक्षा मुद्दा घेऊन आपण काम करत आहोत. सोबतच हॉस्पीटल सुरक्षा आराखडे तयार करण्यात येत आहे.

दिव्यांगांच्या दृष्टीने नियोजन काय?आपतकालीन स्थितीत प्रसंगी दिव्यांग दुर्लक्षीत राहतात. त्यामुळे अशा स्थितीत त्यांना काय मदत करता येईल. त्यांच्या क्षमता त्यादृष्टीने कशा वाढवता येतील. सोबतच समाजामध्ये याबाबत कशी जागृती करता येईल. यावर काम सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि समाज प्रबोधनाबाबत थोडेसे...आपत्ती व्यवस्थापन म्हणजे मल्टी एजन्सी अ‍ॅप्रोचद्वारे धोकची तीव्रता कमी करणे होय. समाज व शासन क्षमता यात महत्त्वाची आहे. घरात आग लागली किंवा बेशुद्ध व्यक्तीला कृत्रिम श्वासोश्वास देण्यो ज्ञानही आपल्याला नाही. त्यामुळे आपण शासनावर अवलंबून राहतो. याबाबत सक्षमता मिळविल्यास शासनावरील अवलंबित्व कमी होऊन समाज यासाठी सक्षम होईल. त्यामुळे शासनस्तरावरूनही रिसोर्सेस उपलब्ध करण्याचा वेग वाढले. त्यादृष्टीने शालेय मुलांपासून याची जागृती गरजेची झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत