शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हवामान बदल आणि नव्या धोक्यांवर काम- विश्वास सुपनेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 15:02 IST

बुलडाणा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हवामान बदलामुळे कृषी, आरोग्यासह सर्वच क्षेत्रात काही नवीन धोके उभे राहत आहे. त्यामध्ये नुकसानाची तीव्रता कमी करण्यासोबतच अशा स्थितीशी कसे जुळवून घ्यावे, तसेच दिव्यांगांनाही आपत्ती काळात काळात कशी मदत करता येईल आणि समाजात त्याबाबत जागरुखता कशी निर्माण होईल, या दृष्टीने यशदाचा आपत्ती व्यवस्तापन विभाग आगामी काळात काम करणार असल्याचे या विभागाचे संचालक विश्वास सुपनेकर यांनी सांगितले. बुलडाणा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी ‘लोकमत’शी बोताना त्यांनी ही माहिती दिली.

शालेय सुरक्षा आराखड्याबाबत सध्याची स्थिती काय?शालेय सुरक्षा आराखडा महत्त्वाचा आहे. राज्यातील सुमारे तीन हजार शाळांचे सुरक्षा आराखडे तयार झाले आहेत. मुलांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव जागृती निर्माण वहावी यासाठी गेल्या दोन वर्षात आपण प्रयत्न केले. आपत्ती व्यवस्थापनात मुलांचा सहभाग आणि त्यांचे ज्ञान वाढावे हा दृष्टीकोण यात आहे.

नॅशनल सायकक्लोन रिस्क मेटीगेशन प्रोग्राम काय आहे?दोन वर्षापूर्वी नॅशनल सायकक्लोन रिस्क मेटीगेशन प्रोजेक्ट अंतर्गत पोलिस, आरोग्य, ग्रामविकास, शहरी विकास विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यांचा आपसी सबंध आहे. मात्र काही कारणास्तव तो बंद पडा. यात आरोग्य विभागात मोठे काम करता आले. दरम्यान, आता शालेय सुरक्षा मुद्दा घेऊन आपण काम करत आहोत. सोबतच हॉस्पीटल सुरक्षा आराखडे तयार करण्यात येत आहे.

दिव्यांगांच्या दृष्टीने नियोजन काय?आपतकालीन स्थितीत प्रसंगी दिव्यांग दुर्लक्षीत राहतात. त्यामुळे अशा स्थितीत त्यांना काय मदत करता येईल. त्यांच्या क्षमता त्यादृष्टीने कशा वाढवता येतील. सोबतच समाजामध्ये याबाबत कशी जागृती करता येईल. यावर काम सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन आणि समाज प्रबोधनाबाबत थोडेसे...आपत्ती व्यवस्थापन म्हणजे मल्टी एजन्सी अ‍ॅप्रोचद्वारे धोकची तीव्रता कमी करणे होय. समाज व शासन क्षमता यात महत्त्वाची आहे. घरात आग लागली किंवा बेशुद्ध व्यक्तीला कृत्रिम श्वासोश्वास देण्यो ज्ञानही आपल्याला नाही. त्यामुळे आपण शासनावर अवलंबून राहतो. याबाबत सक्षमता मिळविल्यास शासनावरील अवलंबित्व कमी होऊन समाज यासाठी सक्षम होईल. त्यामुळे शासनस्तरावरूनही रिसोर्सेस उपलब्ध करण्याचा वेग वाढले. त्यादृष्टीने शालेय मुलांपासून याची जागृती गरजेची झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत