शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

निधीअभावी आसलगाव येथील पुलाचे काम रखडले!

By admin | Updated: October 15, 2015 00:49 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीने दिली तांत्रिक मंजुरात.

आसलगाव (जि. बुलडाणा) : येथील आठवडी बाजारात जाणार्‍या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पुत्रउल्हासी नदीवरील पुलाच्या कामाला तांत्रिक मंजुरात मिळाली आहे; मात्र अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने या पुलाचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, पावसाळ्यात गावात येणार्‍या नागरिक व बाजारासाठी येणार्‍यांना नदीपात्रातून मार्ग काढावा लागत आहे. परिणामी, या पुलाचे काम त्वरेने मार्गी लावण्यात यावे, अशी या आदिवासीबहुल भागातील नागरिकांची मागणी आहे. आसलगावचा मंगळवारी बाजार भरतो. तालुक्यातील ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा बाजार आहे आणि तो नेमका पुत्रउल्हासी नदीच्या काठावर भरतो. त्याकरिता नदीपात्रातील पाण्यातून मार्ग काढून बाजारात जावे लागते. या नदीपात्रात राजुरा धरणाच्या सांडव्यातील पाणी सोडल्याने ४ महिने या नदीला पाणी असते. त्यामधून गावातील वयोवृद्ध विद्यार्थी, महिला यांची त्यातून मार्ग काढताना तारांबळ उडते. याकरिता जिल्हा परिषद सदस्य ज्योती ढोकणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर या नदीवरील पुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरात देण्यात आली आहे; मात्र अद्याप निधीची उपलब्धता झालेली नाही. त्यामुळे हे काम थंडबस्त्यात आहे. पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्योती ढोकणे यांनी पालकमंत्र्यांना हे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, याबाबतही निवेदन दिले आहे. नदीला पूर आल्यास नागरिकांना एक किलोमीटरचा फेरा मारून कामासाठी गावातून बाहेर जावे लागते. सोबतच पावसाळ्यात नदीला पाणी राहत असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने गावात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.