शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

By admin | Updated: November 21, 2015 01:56 IST

चिखली तालुक्यातील मेरा बु. येथे दहा वर्षांपासून सोसावी लागते पाणीटंचाईची झळ.

चिखली (जि. बुलडाणा) : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रा.पं.कडे सुमारे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही गत १0 वर्षांंपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणार्‍या मेरा बु. वासीयांना अद्यापही सुमारे चार रुपये प्रति हंडाप्रमाणे विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने संतप्त महिलांनी २0 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. तालुक्यातील मेरा बु. हे गाव वर्षातील १२ महिने तहानलेले असते. गत दहा वर्षांंपासून गावास तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने ग्रामस्थांना ३ ते ४ रुपये प्रति हंडा प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याने पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट असणार्‍या, मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणार्‍या, गावातील विषेशत: महिलांना पाण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. दरम्यान, गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीला सात कोटी तीन लाख रुपयांचा निधी गत पाच वर्षांंपासून उपलब्ध झाल्यानंतर काम पूर्ण करण्याचा कालावधीही उलटला असताना गावाची तहान भागविली जात नसल्याने संतप्त महिलांनी २0 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी केली. दरम्यान, पाणीपुरवठय़ाची ही समस्या तातडीने निकाली न लावल्यास तहसील व जि.प. कार्यालयावर मोर्चा करण्याचा इशारासुद्धा यावेळी महिलांनी दिला. या मोर्चात गावातील शेकडो महिलांचा सहभाग होता.