बुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजामाता यांच्या जिल्ह्यात वर्धाजिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी याकरिता महिलांनी लढा द्यायलासुरूवात केली आहे. न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूविक्री बंदकरण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंचआणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारीत करूशकतात याकरीता सर्वांनी दक्ष राहून १ मे च्या ग्रामसभेत दारूबंदीचे ठरावपारीत करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागूनअसलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्वपुर्ण निर्णय जाहीरझाल्यामुळे मद्यविक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला.मातृतिर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानवतीने नुकतीच सभा पार पडलीअसून, या सभेत आता जिल्ह्यात बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होवूदेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असतांना,उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजेसंपूर्ण परिवाराची जीवंतपणीच आत्महत्या होय, असा सुर यावेळी सभेलाउपस्थित मान्यवर कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील,सोपान बिचारे, सुरेखाताई निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला.बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदिप काकडे,शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे,शाहीर इंगळे गुरूजी, पदमा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे,उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशिला,गोकुळाबाई भातोकार, शिला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रविभोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा,सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी.रूपने, नलिनीताई उन्हाळेयांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्यानेउपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन सतिष पाटील यांनी मानले. तसेच दारूमुळे मरण पावलेल्याजिल्ह्यातील नागरिकांना सामूहीक श्रध्दांजली अर्पण करून, राष्ट्रगितानेसभेची सांगता करण्यात आली.(प्रतिनिधी)
मातृतीर्थ जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा
By admin | Updated: April 26, 2017 14:08 IST