शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

निवृत्तिवेतन धारकांबाबतचे शुद्धिपत्रक मागे घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १ जानेवारी २०१६नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त ...

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १ जानेवारी २०१६नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २३ डिसेंबर २०२० रोजी शासन शुद्धिपत्रकाच्या नावाखाली सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकविणारा निर्णय घेतला असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक आघाडीने केला आहे. या शुद्धिपत्रात १ जानेवारी २०१६ नंतरच्या निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात/ कुटुंब निवृत्तिवेतनात ७व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत बदल करण्यात आला. त्यामध्ये किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या वाक्याऐवजी ‘कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या त्याच्या मूळ वेतनाच्या’ या वाक्याचा समावेश करण्यात येत आहे, असे या शुद्धिपत्रात नमूद करण्यात आले आहे. यावर आक्षेप घेत महाराष्ट्र शिक्षक आघाडीने निषेध नोंदविला असून, शासनाने हे शुद्धिपत्रक त्वरित मागे घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, उपसचिव, वित्त विभाग यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

शुद्धिपत्रातील शब्दांचा खेळ कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा खेळ करणारा : प्राचार्य डॉ. गावंडे

निवृत्तिवेतनधारकाबाबतचे शुद्धिपत्रक म्हणजे आयुष्यभर शासनाची मनोभावे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाशी केलेला खेळ असून, त्यामुळे अनेक निवृत्तिवेतनधारकांचे जगणे कठीण होणार आहे. शासन शुद्धिपत्रक म्हणजे सुधारणाच्या नावाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची गळचेपी करणारा अन्यायकारक निर्णय असल्याने शासनाने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी केली आहे.