शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहाणपण हा सर्व समस्यांवरील उपाय: सुहास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:23 IST

विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मनुष्याच्या जीवनातील सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे. तो उपाय म्हणजे शहाणपण होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.जीवन विद्या मिशन, मलकापूर शाखेच्यावतीने जळगाव जामोद तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘घर तेथे जीवनविद्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवार २०  जानेवारीला जळगाव जामोद येथील जनता विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात तर मंगळवार २१ जानेवारी रोजी दि न्युरा हायस्कूल मध्ये ‘सदगुरूंचे अनमोल संदेश ’ हा कार्यक्रम झाला. यावेळी बारामती येथील सुहास पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर पुरूषोत्तम टेकाडे,  विजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जनता विद्यालय, न्युरा विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सुमारे दीड विद्यार्थ्यांना ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा’, ‘जसा विचार तसा जीवनाला आकार’, ‘देतो तो देव’, ‘सावध तो सुखी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपरोक्त शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सदगुरू वामनराव पै यांच्या अनेक ग्रंथांची मागणी केली.

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद