शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिमेंटच्या हायवेवरील सरकारला पांदण रस्त्यावर आणणार - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:19 IST

खामगाव:  ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला.

ठळक मुद्दे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानावर आसूड यात्रा काढली आहे. खामगावातील मुख्य रस्त्यावर प्रहारने शक्तीप्रदर्शन केले.यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  

खामगाव:  ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला.

   शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानावर आसूड यात्रा काढली आहे. ही यात्रा शुक्रवारी खामगाव येथे पोहोचली. खामगावातील मुख्य रस्त्यावर प्रहारने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रहारचे संस्थापक आ. बच्चू कडू म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचेही आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत पुत्राचा विजय झाला. त्यामुळे विधान परिषदेत पिता-पुत्र आमदार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता. ही परिस्थिती विधानसभेत आणि  खामगाव मतदार संघातही ‘पिता-पुत्र’ आमदार असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  

दानवे हे दानवच!

बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांना साले म्हणून उपमर्द करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे दानवच आहेत. शेतकºयांचा अपमान करण्याचा अधिकार दानवे यांना नाही. तथापि, पैसा आणि सत्तेच्या मस्तीत दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. हा अपमान अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. त्यासाठीच दानवेंच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात आली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूkhamgaonखामगाव