शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. ...

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्या लाटेमुळे यावर्षी मार्च महिन्यात बसफेऱ्या पुन्हा बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक कामांसाठीच प्रवास करण्यास मुभा होती. संसर्ग होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली. मात्र, आता दुसरी लाटही ओसरली असून, रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अजूनही बससेवा बंद आहे. आता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास होत आहे.

जिल्ह्यातील एकूण बस : ४७०

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या : ३,५००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या : १०००

खेडेगावांमध्ये जाण्यासाठी खासगीचा आधार

खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खासगी वाहन, काळीपिवळी व रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या वाहनांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.

सध्या जवळपास सर्वच बस सुरू केल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील सुरू कराव्या लागणार आहेत.

-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.

खेडेगावावरच अन्याय का?

कोरोना रुग्णसंख्या कमी होऊनदेखील ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली नाही. गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.

-विश्वनाथ तिजारे, शहापूर, प्रवासी.

कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे.

-शेख युनूस, लाखनवाडा, प्रवासी.

हजारो कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहराचाच!

दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात जवळपास अडीचशे बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.