शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हेच ध्येय!

By admin | Updated: July 17, 2017 02:08 IST

शेतकरी संघटनांचा एल्गार मेळाव्यात निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून देणे हेच सुकाणू समितीचे ध्येय असून, ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार रविवार १६ जुलै रोजी येथे आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.सुमारे ५० संघटनांचा समावेश असलेल्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बुलडाणा जिल्हा शाखेच्यावतीने येथे शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. दादा रायपुरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुकाणू समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, गणेश जगताप पुणे, सत्यशोधक किसान सभेचे किशोर धमाले, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे, डॉ. दादासाहेब कविश्वर, कॉ. किसन गुजर, सुशिलाबाई मोराळे, ज्योत्स्ना विसपुत्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, देवेंद्र देशमुख, डॉ. विप्लव कविश्वर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची चिकित्सा करताना ही कर्जमाफी फसवी असल्याचा निष्कर्ष काढला. सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष कर्जमाफी देताना मात्र निकष व अटींचा रतीब घातला. त्यामुळे प्रत्यक्षात या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल, याबाबत शंका आहे. ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सरकारकडून सांगितले जाते. ९० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचा दावाही केला जात आहे; मात्र ही आकडेवारी फसवी आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. कर्जमाफीबाबत सुकाणू समितीशी बोलणी करताना सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, शेतकऱ्यांसाठी गठित एकमेव स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी काँगे्रस सरकारने त्यांच्या कार्यकाळात लागू केल्या नाहीत. तसेच निवडणूक काळात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आले; परंतु त्यांनीही हे आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असून, पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. याकरिता पुढील आंदोलनाची रूपरेषा लवकरच ठरविण्यात येणार असून, या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.सरकारवर हल्लाबोलयावेळी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील व अजित नवले यांनी सरकारवर हल्लाबोल करताना शेतकरी कर्जमाफी ही फसवणूक असल्याचा आरोप केला. तसेच विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये, असा प्रश्न रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला. संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.सुकाणू समितीच्या प्रमुख मागण्याशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतमालाला रास्त भाव द्या, शेतमालावरील निर्यात बंदी उठवा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना ६० वर्ष वयानंतर किमान ३००० रुपये पेन्शन द्या, गायीच्या दुधाला किमान ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची भाकड जनावरे शासनाने खरेदी करून सांभाळावीत, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे.