शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या दरावर नियंत्रण कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

मागील दोन वर्षापासून येथील वाळू घाटाचे लिलाव बंद होते. एका कंत्राटदाराने वाळूचे सरकारी दर जास्त असल्याचे कारण देऊन औरंगाबाद ...

मागील दोन वर्षापासून येथील वाळू घाटाचे लिलाव बंद होते. एका कंत्राटदाराने वाळूचे सरकारी दर जास्त असल्याचे कारण देऊन औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिका खारीज केल्यानंतर जालना, औरंगाबाद, बुलडाणा, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील वाळू घाटाचे लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला. फेब्रुवारीत सिंदखेडराजा तालुक्यातील आठपैकी तीन वाळू घाट लिलावांती सुरू झाले. वाळूचे सरकारी दर, पर्यावरण शुल्क, जीएसटी असे सर्व शुल्क मिळून वाळू घाट घेणाऱ्या कंत्राटदाराला जागेवर दोन हजार आठशेपेक्षा जास्त दराने वाळूचा ठेका मिळाला. वाळू वाहतूक सुरू करण्यासाठी दोन दिवसापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाळू घाट मोजून देण्यात आले. त्यामुळे ग्राहकांपर्यंत वाळू वाहतूक करणे सोपे झाले असले तरीही दोन वर्षांपूर्वी वाळूचे प्रति ब्रासचे दर आणि आजचे दर यात खूप मोठी तफावत आहे. सध्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरांची बांधकामे सुरू आहेत. ज्यांना या योजनेतून घरे मिळाली आहेत, ते लोक अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे त्यांना पाच ते सहा हजार रुपये दराने मिळणारी वाळू घेणे शक्य नाही. वाळूच्या वाढलेल्या दरामुळे बांधकाम क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पर्यायाने नगर परिषद सारख्या स्वायत्त संस्थेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. घरे बांधल्यानंतर नगर परिषदांना वाढीव मालमत्ता कर मिळतो, त्याचे मार्ग बंद आहेत.

उर्वरित रेती घाट सुरू करण्याची मागणी

एकीकडे वाळूचे वाढलेले दर आणि दुसरीकडे प्रशासनाची बेफिकिरी यात सामान्य माणूस भरडला जात आहे. ग्राहकांपर्यंत जाणाऱ्या वाळूचे प्रती ब्रास दर काय असावेत याची माहिती स्थानिक प्रशासनाला नाही. मुळात सरकारने दिलेला एक भाव आणि ग्राहकांपर्यंत जाणारा भाव यात मेळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरित पाच वाळू घाट त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.