शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांचा वाली कोण?

By admin | Updated: May 15, 2017 00:08 IST

नगरपालिकेने केली कर वसुली, मतदान मात्र जिल्हा परिषदेला : नागरी सुविधांसाठी कानावर हात

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील शिक्षक कॉलनी, बालाजी नगर, पवनसुत नगर, तेजस्वी नगर व नवीन वस्ती या भागातील नागरिकांची अवस्था विचित्र झाली आहे. हा परिसर शहरात आहे; मात्र कागदोपत्री मेहकर शहराच्या हद्दीबाहेर करण्यात आला आहे. दुसरीकडे या भागातील नागरिकांकडून नगरपालिकेने कर वसुली केली आणि मतदान मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करावे लागले. त्यामुळे या भागाचा विकास करायचा तर पालिका व जिल्हा परिषद हे दोघेही कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे आमचा वाली कोण, असा सवाल या नागरिकांचा आहे. मेहकर शहरातील जानेफळ फाट्यापासून ते गजानन महाराज मंदिरापर्यंत गेल्या १० ते १२ वर्षांपासून नवीन वस्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी आपली नावे नगरपालिकेच्या मतदान यादीमध्ये टाकून घेतलेली आहे. जवळपास ४ ते ५ हजारांच्या आसपास मतदार या भागात आहेत. या नागरिकांनी मागील दोन पंचवार्षिकमध्ये न.पा.च्या निवडणुकीत मतदान केले होते; परंतु यावर्षी या परिसरातील काही भाग नगरपालिकेने न.पा.च्या हद्दीबाहेर टाकल्याने नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही; परंतु मतदानापासून वंचित ठेवता येत नसल्याने वंचित राहिलेल्या मतदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या सर्व घडामोडीमध्ये या परिसराच्या विकासासाठी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कोणीही समोर यायला तयार नाही. नगरपालिकेच्या हद्दीत हा भाग नसला, तरी नळाचे पाणी, स्ट्रीट लाइट या दोन सुविधा नगरपालिकेकडून सुरुवातीपासूनच या भागाला मिळतात. इतर सुविधा मात्र हद्दीबाहेर या शब्दात अटकल्या आहेत. जे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नागरिकांनी निवडून दिलेले आहे, ते सदस्य निवडणुका झाल्यापासून दिसेनासे झाले आहेत. तर हद्दीबाहेर असल्याने नगरसेवकही येथून काढता पाय घेत आहेत. या परिसरात जे जुने रस्ते झाले आहेत, त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मेहकरच्या काही भागात नवीन वस्ती झाली, त्या वस्तीत रस्तेच नाहीत. पावसाळा जवळ येत असल्याने या नागरिकांची मोठी पंचाईत होणार आहे. हद्दीबाहेर असलेला हा भाग कोणत्याही ग्रा.पं.ला जोडलेला नाही, तर नगरपालिकेमध्येसुद्धा नाही. त्यामुळे रस्ते व इतर विकासासाठी या परिसरातील नागरिकांनी नेमकी कोणाकडे मागणी करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज हद्दीबाहेर गेलेल्या या परिसरातील नागरिकांनी खासदार, आमदार यांना मतदान केलेले आहे, तर माजी नगरसेवकांनासुद्धा मागील वेळेस मतदान केलेले आहे. त्यामुळे केवळ हद्दीबाहेर हा मुद्दा धरून या परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे. निवडणुका आल्या, की या परिसरातील नागरिकांचा मतदानापुरता उपयोग करून घ्यायचा व नंतर हद्दीबाहेर आहे म्हणून विकासाकडे दुर्लक्ष करायचे, हे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सदर समस्या सोडविण्याची गरज आहे.राजकारणातील गटबाजी नागरिकांसाठी डोकेदुखी सध्या शिवसेना पक्ष थोड्याफार प्रमाणात सोडला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्वच पक्षात गटबाजी आहे. जो-तो आपला वेगळा गट तयार करून पक्षश्रेष्ठींसमोर वजन वाढविण्याच्या प्रयत्न करीत आहे. पक्षातील या गटबाजीमुळे नवीन वस्तीतील काही भाग हद्दीबाहेर गेलेला आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांची स्थिती म्हणजे देवळातील घंट्यासारखी झाली आहे. राजकारणतील गटबाजी ही या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.