शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

दाेन हजार हेक्टरावर उगवणार ‘पांढरे सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती ...

सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती येत आहे़ त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका बसला. त्यात अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा केवळ दोन हजार हेक्टरवरच कापसाची लागवड होण्याची चिन्हे आहेत.

चिखली तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतजमिनीपैकी २०१६ पूर्वी सुमारे ८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जात होती. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ, कापूस वेचणीचा वाढलेला दर, अशी स्थिती असूनही ऐनवेळी कापूस वेचणीस मजूर मिळत नाहीत, तसेच हमीभाव केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. बोंडअळी आणि बोगस बियाणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने सन २०१७ पासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यात गतवर्षी सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक कापसाचा पेरा झाला होता. मात्र, गत हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. वेचणीसाठी अतिरिक्त पैसे मोजूनही ऐनवेळी मजूरदेखील मिळत नव्हते. तथापि हमीभाव केंद्र वेळेवर सुरू झाले नाहीत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट केली. याचा विपरीत परिणाम यंदा लागवड क्षेत्रावर झाला असल्याने यंदा केवळ २,००० हेक्टरावर पांढरे सोने उगवण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले आहे.

सुमारे १३ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता!

तालुक्यात नियोजित २ हजार हेक्टरावर लागवडीसाठी सुमारे १३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये बी.टी. बियाणे, सुधारित बियाणे व देशी बियाण्यांचा समावेश आहे.

दोन गावांत ‘एक गाव, एक वाण’ खरेदी केंद्रही

वेळेवर सुरू होत नसल्याने नुकसान होत असून,

साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरात कापूस दाखल होतो. गतवर्षी दिवाळीतदेखील शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यात गतवर्षी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. याचा फटकादेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत आहेत.