शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दाेन हजार हेक्टरावर उगवणार ‘पांढरे सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती ...

सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती येत आहे़ त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका बसला. त्यात अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा केवळ दोन हजार हेक्टरवरच कापसाची लागवड होण्याची चिन्हे आहेत.

चिखली तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतजमिनीपैकी २०१६ पूर्वी सुमारे ८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जात होती. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ, कापूस वेचणीचा वाढलेला दर, अशी स्थिती असूनही ऐनवेळी कापूस वेचणीस मजूर मिळत नाहीत, तसेच हमीभाव केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. बोंडअळी आणि बोगस बियाणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने सन २०१७ पासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यात गतवर्षी सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक कापसाचा पेरा झाला होता. मात्र, गत हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. वेचणीसाठी अतिरिक्त पैसे मोजूनही ऐनवेळी मजूरदेखील मिळत नव्हते. तथापि हमीभाव केंद्र वेळेवर सुरू झाले नाहीत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट केली. याचा विपरीत परिणाम यंदा लागवड क्षेत्रावर झाला असल्याने यंदा केवळ २,००० हेक्टरावर पांढरे सोने उगवण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले आहे.

सुमारे १३ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता!

तालुक्यात नियोजित २ हजार हेक्टरावर लागवडीसाठी सुमारे १३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये बी.टी. बियाणे, सुधारित बियाणे व देशी बियाण्यांचा समावेश आहे.

दोन गावांत ‘एक गाव, एक वाण’ खरेदी केंद्रही

वेळेवर सुरू होत नसल्याने नुकसान होत असून,

साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरात कापूस दाखल होतो. गतवर्षी दिवाळीतदेखील शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यात गतवर्षी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. याचा फटकादेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत आहेत.