शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

दाेन हजार हेक्टरावर उगवणार ‘पांढरे सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती ...

सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती येत आहे़ त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका बसला. त्यात अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा केवळ दोन हजार हेक्टरवरच कापसाची लागवड होण्याची चिन्हे आहेत.

चिखली तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतजमिनीपैकी २०१६ पूर्वी सुमारे ८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जात होती. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ, कापूस वेचणीचा वाढलेला दर, अशी स्थिती असूनही ऐनवेळी कापूस वेचणीस मजूर मिळत नाहीत, तसेच हमीभाव केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. बोंडअळी आणि बोगस बियाणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने सन २०१७ पासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यात गतवर्षी सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक कापसाचा पेरा झाला होता. मात्र, गत हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. वेचणीसाठी अतिरिक्त पैसे मोजूनही ऐनवेळी मजूरदेखील मिळत नव्हते. तथापि हमीभाव केंद्र वेळेवर सुरू झाले नाहीत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट केली. याचा विपरीत परिणाम यंदा लागवड क्षेत्रावर झाला असल्याने यंदा केवळ २,००० हेक्टरावर पांढरे सोने उगवण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले आहे.

सुमारे १३ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता!

तालुक्यात नियोजित २ हजार हेक्टरावर लागवडीसाठी सुमारे १३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये बी.टी. बियाणे, सुधारित बियाणे व देशी बियाण्यांचा समावेश आहे.

दोन गावांत ‘एक गाव, एक वाण’ खरेदी केंद्रही

वेळेवर सुरू होत नसल्याने नुकसान होत असून,

साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरात कापूस दाखल होतो. गतवर्षी दिवाळीतदेखील शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यात गतवर्षी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. याचा फटकादेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत आहेत.