शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दाेन हजार हेक्टरावर उगवणार ‘पांढरे सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती ...

सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात सोयाबीननंतर प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कापसाच्या पिकात सातत्याने नुकसान हाती येत आहे़ त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. गतवर्षी अडीच हजार हेक्टरावर कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका बसला. त्यात अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा केवळ दोन हजार हेक्टरवरच कापसाची लागवड होण्याची चिन्हे आहेत.

चिखली तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतजमिनीपैकी २०१६ पूर्वी सुमारे ८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जात होती. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ, कापूस वेचणीचा वाढलेला दर, अशी स्थिती असूनही ऐनवेळी कापूस वेचणीस मजूर मिळत नाहीत, तसेच हमीभाव केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. बोंडअळी आणि बोगस बियाणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने सन २०१७ पासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यात गतवर्षी सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक कापसाचा पेरा झाला होता. मात्र, गत हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. वेचणीसाठी अतिरिक्त पैसे मोजूनही ऐनवेळी मजूरदेखील मिळत नव्हते. तथापि हमीभाव केंद्र वेळेवर सुरू झाले नाहीत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट केली. याचा विपरीत परिणाम यंदा लागवड क्षेत्रावर झाला असल्याने यंदा केवळ २,००० हेक्टरावर पांढरे सोने उगवण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले आहे.

सुमारे १३ हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता!

तालुक्यात नियोजित २ हजार हेक्टरावर लागवडीसाठी सुमारे १३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये बी.टी. बियाणे, सुधारित बियाणे व देशी बियाण्यांचा समावेश आहे.

दोन गावांत ‘एक गाव, एक वाण’ खरेदी केंद्रही

वेळेवर सुरू होत नसल्याने नुकसान होत असून,

साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरात कापूस दाखल होतो. गतवर्षी दिवाळीतदेखील शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. त्यात गतवर्षी जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. याचा फटकादेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत आहेत.