शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कुठे बैलगाडी फसते; कुठे शेतमाल अडकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु ...

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु पाणंद रस्ते व्यवस्थित नसल्याने शेतमाल घरापर्यंत पोहोचेल की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या कुठे बैलगाडी फसते; तर कुठे शेतमाल अडकतो, असा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहे. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी लाखो रुपये निधी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांसमोर अद्यापही रस्त्यांचा प्रश्न आ वासून आहे. सुरुवातीला काही भागात लोकवर्गणीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती; परंतु त्यातही अतिक्रमणाचा खोडा आल्याने अनेक रस्ते अर्धवट राहिले आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी निधी देण्यात आला; परंतु जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या या पावसाने आता पाणंद रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. सध्या शेतमाल घरी आणणे म्हणजे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शेतात पायी जाणेही झाले कठीण

माझ्या घरापासून ते शेतापर्यंत जवळपास तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे; परंतु हा रस्ता अत्यंत अरुंद व चिखलमय झालेला असल्याने या रस्त्याने बैलगाडी नेणे तर अवघडच साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे.

गणेश देशमुख, शेतकरी.

बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले

परिसरात पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पाणंद रस्त्यातच बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणंद रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.

योगेश नाईक, शेतकरी.

५८५ कि.मी., ३५० रस्ते...

जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. यामध्ये ५८५ किमी लांबीचे ३५० रस्ते बनविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

एका शिवारातच नव्हे, सर्वत्रच चिखल

पाणंद रस्त्याचा हा प्रश्न एखाद्याच शिवारात नाही, तर सर्वत्रच आहे. सध्या पावसाने पाणंद रस्त्यावर चिखल निर्माण होणे, साहजिक आहे; परंतु काही ठिकाणी त्या रस्त्याने बैलगाडीही चालवता येत नसल्याचे दिसून येते.

शासनदरबारी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निवेदनही देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांअभावी शेतात जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

राजेंद्र पळसकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद बुलडाणा.