शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

कुठे बैलगाडी फसते; कुठे शेतमाल अडकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु ...

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु पाणंद रस्ते व्यवस्थित नसल्याने शेतमाल घरापर्यंत पोहोचेल की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या कुठे बैलगाडी फसते; तर कुठे शेतमाल अडकतो, असा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहे. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी लाखो रुपये निधी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांसमोर अद्यापही रस्त्यांचा प्रश्न आ वासून आहे. सुरुवातीला काही भागात लोकवर्गणीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती; परंतु त्यातही अतिक्रमणाचा खोडा आल्याने अनेक रस्ते अर्धवट राहिले आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी निधी देण्यात आला; परंतु जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या या पावसाने आता पाणंद रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. सध्या शेतमाल घरी आणणे म्हणजे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शेतात पायी जाणेही झाले कठीण

माझ्या घरापासून ते शेतापर्यंत जवळपास तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे; परंतु हा रस्ता अत्यंत अरुंद व चिखलमय झालेला असल्याने या रस्त्याने बैलगाडी नेणे तर अवघडच साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे.

गणेश देशमुख, शेतकरी.

बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले

परिसरात पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पाणंद रस्त्यातच बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणंद रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.

योगेश नाईक, शेतकरी.

५८५ कि.मी., ३५० रस्ते...

जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. यामध्ये ५८५ किमी लांबीचे ३५० रस्ते बनविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

एका शिवारातच नव्हे, सर्वत्रच चिखल

पाणंद रस्त्याचा हा प्रश्न एखाद्याच शिवारात नाही, तर सर्वत्रच आहे. सध्या पावसाने पाणंद रस्त्यावर चिखल निर्माण होणे, साहजिक आहे; परंतु काही ठिकाणी त्या रस्त्याने बैलगाडीही चालवता येत नसल्याचे दिसून येते.

शासनदरबारी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निवेदनही देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांअभावी शेतात जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

राजेंद्र पळसकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद बुलडाणा.