शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कुठे बैलगाडी फसते; कुठे शेतमाल अडकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु ...

बुलडाणा : जिल्ह्यात पावसामुळे पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढण्यात येत आहे; परंतु पाणंद रस्ते व्यवस्थित नसल्याने शेतमाल घरापर्यंत पोहोचेल की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या कुठे बैलगाडी फसते; तर कुठे शेतमाल अडकतो, असा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहे. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी लाखो रुपये निधी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांसमोर अद्यापही रस्त्यांचा प्रश्न आ वासून आहे. सुरुवातीला काही भागात लोकवर्गणीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती; परंतु त्यातही अतिक्रमणाचा खोडा आल्याने अनेक रस्ते अर्धवट राहिले आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी निधी देण्यात आला; परंतु जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या या पावसाने आता पाणंद रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. सध्या शेतमाल घरी आणणे म्हणजे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शेतात पायी जाणेही झाले कठीण

माझ्या घरापासून ते शेतापर्यंत जवळपास तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे; परंतु हा रस्ता अत्यंत अरुंद व चिखलमय झालेला असल्याने या रस्त्याने बैलगाडी नेणे तर अवघडच साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे.

गणेश देशमुख, शेतकरी.

बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले

परिसरात पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पाणंद रस्त्यातच बैलगाडी फसण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणंद रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.

योगेश नाईक, शेतकरी.

५८५ कि.मी., ३५० रस्ते...

जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे. यामध्ये ५८५ किमी लांबीचे ३५० रस्ते बनविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

एका शिवारातच नव्हे, सर्वत्रच चिखल

पाणंद रस्त्याचा हा प्रश्न एखाद्याच शिवारात नाही, तर सर्वत्रच आहे. सध्या पावसाने पाणंद रस्त्यावर चिखल निर्माण होणे, साहजिक आहे; परंतु काही ठिकाणी त्या रस्त्याने बैलगाडीही चालवता येत नसल्याचे दिसून येते.

शासनदरबारी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निवेदनही देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना सध्या पाणंद रस्त्यांअभावी शेतात जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

राजेंद्र पळसकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद बुलडाणा.