शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महामार्गावरील विद्युतदिवे कधी उजाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट काँक्रीटने पूर्ण तयार झाला असून, स्थानिक मेहकर फाटा ते शेलूद या गावापर्यंत रस्त्याच्या मधोमध साजेशे व मुबलक प्रमाणात विद्युत पोल उभे करून त्यावर दिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही हे दिवे अद्याप उजळले नसल्याने, महामार्गावरील विद्युत दिवे उजाळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जालना ते खामगावपर्यंत सिमेंट काँक्रीट महामार्गाअंतर्गत चिखली शहरातून जाणारा रस्ता पूर्णपणे तयार होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आहे. नव्या कोऱ्या व चकचकीत अशा या रस्त्यावरून वाहने चालविताना पोटातले पाणी देखील हलत नाही. रहदारीसाठी हा रस्ता सुकर आहे. मानवी वस्ती व वर्दळीच्या ठिकाणी 'डिव्हायडर'मध्ये ठिकठिकाणी ठराविक अंतरावर विद्युत पोल उभारण्यात येऊन पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकात 'हायमास्ट' दिव्यांची व्यवस्था आहे. यांअर्तगत मेहकर फाटा ते चिखली शहर व बायपासमार्गे जिल्हा सहकारी बँकेजवळील चौफुली आणि पुढे शेलूद या नागरी वस्तीत पथदिव्यांची व्यवस्था आहे. या पथदिव्यांच्या उभारणीपश्चात मध्यंतरी पथदिवे व हायमास्ट दिव्यांची 'टेस्टिंग' झाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप रस्त्यांवरील हे दिवे उजळलेले नाहीत. त्यामुळे रहिवासी व पादचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

तरच शहराला झळाली मिळेल !

मेहकर फाटा ते शेलूद या सहा ते सात किमी अंतरावरील रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकांत मोठे पोल उभे करून हायमास्ट दिवे लावले. परंतु, अद्यापही या दिव्यांना वीज मिळाली नाही. हे दिवे उजळल्यास रात्रीला रस्त्यावरील अंधार दूर होण्यासह शहराला झळाळी प्राप्त होईल. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व पालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतने समन्वयाने तोडगा काढणे आवश्यक आहे.

'रबलींग स्ट्रीप'ची गरज

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, नागरी वस्तीतूनही या महामार्गावरून वाहने सुसाट धावतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी नागरीवस्ती, रहदारी, चौक, शाळा, महाविद्यालय परिसरात रबलिंग स्ट्रीप टाकणे आवश्यक आहे.