शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील विद्युतदिवे कधी उजाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट काँक्रीटने पूर्ण तयार झाला असून, स्थानिक मेहकर फाटा ते शेलूद या गावापर्यंत रस्त्याच्या मधोमध साजेशे व मुबलक प्रमाणात विद्युत पोल उभे करून त्यावर दिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही हे दिवे अद्याप उजळले नसल्याने, महामार्गावरील विद्युत दिवे उजाळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जालना ते खामगावपर्यंत सिमेंट काँक्रीट महामार्गाअंतर्गत चिखली शहरातून जाणारा रस्ता पूर्णपणे तयार होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आहे. नव्या कोऱ्या व चकचकीत अशा या रस्त्यावरून वाहने चालविताना पोटातले पाणी देखील हलत नाही. रहदारीसाठी हा रस्ता सुकर आहे. मानवी वस्ती व वर्दळीच्या ठिकाणी 'डिव्हायडर'मध्ये ठिकठिकाणी ठराविक अंतरावर विद्युत पोल उभारण्यात येऊन पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकात 'हायमास्ट' दिव्यांची व्यवस्था आहे. यांअर्तगत मेहकर फाटा ते चिखली शहर व बायपासमार्गे जिल्हा सहकारी बँकेजवळील चौफुली आणि पुढे शेलूद या नागरी वस्तीत पथदिव्यांची व्यवस्था आहे. या पथदिव्यांच्या उभारणीपश्चात मध्यंतरी पथदिवे व हायमास्ट दिव्यांची 'टेस्टिंग' झाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप रस्त्यांवरील हे दिवे उजळलेले नाहीत. त्यामुळे रहिवासी व पादचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

तरच शहराला झळाली मिळेल !

मेहकर फाटा ते शेलूद या सहा ते सात किमी अंतरावरील रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकांत मोठे पोल उभे करून हायमास्ट दिवे लावले. परंतु, अद्यापही या दिव्यांना वीज मिळाली नाही. हे दिवे उजळल्यास रात्रीला रस्त्यावरील अंधार दूर होण्यासह शहराला झळाळी प्राप्त होईल. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व पालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतने समन्वयाने तोडगा काढणे आवश्यक आहे.

'रबलींग स्ट्रीप'ची गरज

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, नागरी वस्तीतूनही या महामार्गावरून वाहने सुसाट धावतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी नागरीवस्ती, रहदारी, चौक, शाळा, महाविद्यालय परिसरात रबलिंग स्ट्रीप टाकणे आवश्यक आहे.