शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

महामार्गावरील विद्युतदिवे कधी उजाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट काँक्रीटने पूर्ण तयार झाला असून, स्थानिक मेहकर फाटा ते शेलूद या गावापर्यंत रस्त्याच्या मधोमध साजेशे व मुबलक प्रमाणात विद्युत पोल उभे करून त्यावर दिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही हे दिवे अद्याप उजळले नसल्याने, महामार्गावरील विद्युत दिवे उजाळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जालना ते खामगावपर्यंत सिमेंट काँक्रीट महामार्गाअंतर्गत चिखली शहरातून जाणारा रस्ता पूर्णपणे तयार होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आहे. नव्या कोऱ्या व चकचकीत अशा या रस्त्यावरून वाहने चालविताना पोटातले पाणी देखील हलत नाही. रहदारीसाठी हा रस्ता सुकर आहे. मानवी वस्ती व वर्दळीच्या ठिकाणी 'डिव्हायडर'मध्ये ठिकठिकाणी ठराविक अंतरावर विद्युत पोल उभारण्यात येऊन पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकात 'हायमास्ट' दिव्यांची व्यवस्था आहे. यांअर्तगत मेहकर फाटा ते चिखली शहर व बायपासमार्गे जिल्हा सहकारी बँकेजवळील चौफुली आणि पुढे शेलूद या नागरी वस्तीत पथदिव्यांची व्यवस्था आहे. या पथदिव्यांच्या उभारणीपश्चात मध्यंतरी पथदिवे व हायमास्ट दिव्यांची 'टेस्टिंग' झाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप रस्त्यांवरील हे दिवे उजळलेले नाहीत. त्यामुळे रहिवासी व पादचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

तरच शहराला झळाली मिळेल !

मेहकर फाटा ते शेलूद या सहा ते सात किमी अंतरावरील रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकांत मोठे पोल उभे करून हायमास्ट दिवे लावले. परंतु, अद्यापही या दिव्यांना वीज मिळाली नाही. हे दिवे उजळल्यास रात्रीला रस्त्यावरील अंधार दूर होण्यासह शहराला झळाळी प्राप्त होईल. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व पालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतने समन्वयाने तोडगा काढणे आवश्यक आहे.

'रबलींग स्ट्रीप'ची गरज

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, नागरी वस्तीतूनही या महामार्गावरून वाहने सुसाट धावतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी नागरीवस्ती, रहदारी, चौक, शाळा, महाविद्यालय परिसरात रबलिंग स्ट्रीप टाकणे आवश्यक आहे.