शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST

बुलडाणा : कोरोनामुळे गत एक वर्षांपासून उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील ...

बुलडाणा : कोरोनामुळे गत एक वर्षांपासून उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर परत गेल्याने कामगारांचीही वाणवा जाणवत आहे.

खामगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत असून, अनेक उद्योग आहेत. मात्र, गत एक वर्षापासून उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. एमआयडीसीत प्रामुख्याने ऑईल मिल व दालमिल आहेत. मात्र, हे व्यवसायही नुकसानात असल्याने आठ ते दहा ऑईलमिल व दालमिलच सुरू आहेत. अनेक कंपन्यांनी उत्पादन अर्धे केले आहे. तसेच अनेकांनी कर्ज घेतल्यामुळे त्याची परतफेड करणे शक्य होत नाही. दुसरीकडे बॅंका तगादा लावत आहे.

कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील आहेत. हे सर्व कामगार परत गेले आहेत. या कामगारांना कंपनीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे काम लवकर व सुरळीत होते. मात्र हे कामगार परत गेले आहे. त्यामुळेही अनेक उद्योजकांना मजुरांची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे स्थानिक मजुरांना काम मिळत नाही. स्थानिक मजूर कामाच्या शोधात आहेत. मात्र, या मजुरांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागणार असल्याने उद्योजकही त्यांना रोजगार देण्यास धजावत नाहीत.

कोरोनामुळे मजूरवर्गावर अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक कंपन्या बंद आहेत. दुसरीकडे कुठेही काम मिळत नाही. काही कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये काम सुरू आहे. कमी कामगारांना आता अधिक काम करावे लागत आहे. आगामी दहा दिवस आणखी कडक लाॅकडाऊन लागल्यामुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

- राजेश बन्सोड, कामगार, खामगाव

गत एक वर्षापासून कंपनी बंदच आहे. कोरोनामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे आर्थिक चक्रच बिघडले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे ठिबक विकत घेण्यास शेतकरी तयार होत नाहीत. ठिबक लावणे आवश्यक नसून, नंतरही लावता येते. त्यामुळे शेतकरी फक्त आवश्यक वस्तूच खरेदी करीत आहेत. मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे यावर्षी उत्पादनच बंद ठेवले आहे. फक्त कृषी सेवा केंद्रच सुरू असून, बियाणे व औषधींचीच विक्री सुरू आहे.

- अजय खाकरे, ठिबक निर्माते, खामगाव

कोरोनामुळे गत एक वर्षापासून व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. उद्योगांची स्थिती अत्यंत खराब आहे. सर्वच उद्योजकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. केवळ मजुरांना मजुरी देण्याकरिता काही वेळांकरिता कंपनी सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ज्यांनी मालाची ऑर्डर दिली आहे. तेही माल घ्यायला तयार नाहीत. कच्चा मालही मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना नुकसानाची सामना करावा लागत आहे.

- मोहन टावरी, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन, खामगाव

कच्चा माल मिळण्यात अडचणी

उद्योजकांना कच्चा माल मिळण्यातही अनेक अडचणी येत आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची वाहतुकीवरही बंधने आली आहेत. तसेच सर्वत्रच उद्योगधंदे अडचणीत आल्याने कच्चा माल उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांकडूनही कमी प्रतिसाद मिळत आहे. काही उद्योजक परराज्यातून कच्चा माल बोलावतात, मात्र, लाॅकडाऊमुळे त्यातही अनेक समस्या येत आहे.