शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST

बुलडाणा : कोरोनामुळे गत एक वर्षांपासून उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील ...

बुलडाणा : कोरोनामुळे गत एक वर्षांपासून उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर परत गेल्याने कामगारांचीही वाणवा जाणवत आहे.

खामगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत असून, अनेक उद्योग आहेत. मात्र, गत एक वर्षापासून उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. एमआयडीसीत प्रामुख्याने ऑईल मिल व दालमिल आहेत. मात्र, हे व्यवसायही नुकसानात असल्याने आठ ते दहा ऑईलमिल व दालमिलच सुरू आहेत. अनेक कंपन्यांनी उत्पादन अर्धे केले आहे. तसेच अनेकांनी कर्ज घेतल्यामुळे त्याची परतफेड करणे शक्य होत नाही. दुसरीकडे बॅंका तगादा लावत आहे.

कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील आहेत. हे सर्व कामगार परत गेले आहेत. या कामगारांना कंपनीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे काम लवकर व सुरळीत होते. मात्र हे कामगार परत गेले आहे. त्यामुळेही अनेक उद्योजकांना मजुरांची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे स्थानिक मजुरांना काम मिळत नाही. स्थानिक मजूर कामाच्या शोधात आहेत. मात्र, या मजुरांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागणार असल्याने उद्योजकही त्यांना रोजगार देण्यास धजावत नाहीत.

कोरोनामुळे मजूरवर्गावर अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक कंपन्या बंद आहेत. दुसरीकडे कुठेही काम मिळत नाही. काही कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये काम सुरू आहे. कमी कामगारांना आता अधिक काम करावे लागत आहे. आगामी दहा दिवस आणखी कडक लाॅकडाऊन लागल्यामुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

- राजेश बन्सोड, कामगार, खामगाव

गत एक वर्षापासून कंपनी बंदच आहे. कोरोनामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे आर्थिक चक्रच बिघडले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे ठिबक विकत घेण्यास शेतकरी तयार होत नाहीत. ठिबक लावणे आवश्यक नसून, नंतरही लावता येते. त्यामुळे शेतकरी फक्त आवश्यक वस्तूच खरेदी करीत आहेत. मागणी कमी प्रमाणात असल्यामुळे यावर्षी उत्पादनच बंद ठेवले आहे. फक्त कृषी सेवा केंद्रच सुरू असून, बियाणे व औषधींचीच विक्री सुरू आहे.

- अजय खाकरे, ठिबक निर्माते, खामगाव

कोरोनामुळे गत एक वर्षापासून व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. उद्योगांची स्थिती अत्यंत खराब आहे. सर्वच उद्योजकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. केवळ मजुरांना मजुरी देण्याकरिता काही वेळांकरिता कंपनी सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ज्यांनी मालाची ऑर्डर दिली आहे. तेही माल घ्यायला तयार नाहीत. कच्चा मालही मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना नुकसानाची सामना करावा लागत आहे.

- मोहन टावरी, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन, खामगाव

कच्चा माल मिळण्यात अडचणी

उद्योजकांना कच्चा माल मिळण्यातही अनेक अडचणी येत आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची वाहतुकीवरही बंधने आली आहेत. तसेच सर्वत्रच उद्योगधंदे अडचणीत आल्याने कच्चा माल उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांकडूनही कमी प्रतिसाद मिळत आहे. काही उद्योजक परराज्यातून कच्चा माल बोलावतात, मात्र, लाॅकडाऊमुळे त्यातही अनेक समस्या येत आहे.