शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

गहू, हरभरा व करडईला मिळणार विमा संरक्षण

By admin | Updated: November 5, 2014 23:52 IST

कृषी विभागाच्या पीक विमा योजनेत समावेश : रब्बी हंगामाला मिळणार लाभ.

खामगाव (बुलडाणा): राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना २0१४-१५ अंतर्गत रब्बी हंगामातील पिकासाठी विमा संरक्षण म्हणून पीक विमा योजना भरण्याची शासनाकडून मान्यता आहे. या पीक विमा योजनेत जिल्ह्यातील गहू (बागायत, जिरायत), हरभरा व करडई या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. पावसाने कृपा केली तरच भरघोस उत्पादन शेतकर्‍यांना मिळते. कधी अतवृष्टीमुळे तर कधी अपुर्‍या पावसामुळे, गारपिटीमुळे, रोगराईमुळे उत्पादनात घट येते. या परिस्थितीत शेतकरी किफायतशीर शेती करू शकत नाही. बँकेकडून घेतलेले पेरणीचे कर्जही फेडू शकत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने पूर्वीची सर्वंकष पीक विमा योजना बंद करून सुधारित नवीन राष्ट्रीय पीक विमा योजना सन १९९९-२000 पासून लागू केली आहे. आपत्तीसमयी शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात. पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून पंचनामे करून निश्‍चित करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना ५0 टक्के पीक विमा हप्त्यात अनुदान राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गहू (बागायत) पीक विमा योजनेत तेराही तालुक्यांचा समावेश आहे. तर गहू (जिरायत) पीक विमा शेगाव, मेहकर, लोणार तालुक्यासाठी राहणार आहे. हरभरा पिकासाठी चिखली, बुलडाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव व नांदुरा या दहा तालुक्यांना समाविष्ट केले आहे. करडई पिकाचा विमा चिखली, बुलडाणा, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यासाठी लागू होणार आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा पीक विमा संरक्षणासाठी शेतकर्‍यांनी पेरणीपत्र व सातबारा तलाठीकडून घेऊन ज्या बँकेत शेतकर्‍यांचे खाते असेल त्या बँकेत विहित नमुन्यातील अर्जासह पीक विमा रकमेचा बँकेत भरणा करावा, असे तालुका कृषी अधिकारी एम.डी. जाधव, तालुका कृषी अधिकारी, खामगाव यांनी सांगीतले.