शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:50 IST

जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देभारनियमनाविरोधात काँग्रेसने फुंकले रणशिंग विरोधी पक्षांची जागरूकता वाढली

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान  योजनेंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; मात्र कर्जमाफीचा  लाभ घेण्यासाठी विविध अडचणींची शर्यत ठेवून अंतिम  मुदतसुद्धा १५ सप्टेंबर देण्यात आली होती. कर्जमाफीचा  लाभ प्रत्येक शेतकर्‍यांला मिळावा व त्यातील अटी शिथिल  कारण्यात याव्या यासह कर्जमाफीचे ऑनलाइन अर्जाची मुद त वाढविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व  इतर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. कर्जमाफीच्या मुद्दावरून  जिल्ह्यात विरोधकांची आक्रमकता वाढतच गेली. परिणामी  १४ सप्टेंबरला कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी २२ स प्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. कर्जमाफीनंतर आता  जिल्ह्यातील विरोधी पक्षांनी भारनियमनाचा मुद्दा उचलला  आहे. जिल्ह्यात महावितरणने भारनियमन सुरू केले असून,  शहरासह ग्रामीण भागात तासन्तास विद्युत पुरवठा खंडित  केल्या जात आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या विरोधात  जिल्ह्यात काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी  सरकारच्या निषेधार्थ जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने कंदिल  मोर्चाचा मार्ग पत्करण्यात आला आहे. विरोधी बाकावर बसून सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी  आवाज उठविण्याचे कार्य काही काळ जिल्ह्यात थंडावले  होते; मात्र आता कर्जमाफीनंतर भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्ष  वारंवार आंदोलन व मोर्चे काढून आपली विरोधी पक्षाचे  अस्तित्व टिकून ठेवत आहे. सरकारच्या विरोधात प्रश्नांमागून प्रश्न उचलले जात  असल्याने जिल्ह्यातील विरोधी पक्षांना आता आपल्या क र्तव्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विरोधकांची आंदोलनांची मालिका सुरूच!विरोधी बाकावर बसून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा  फोडण्यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात  आंदोलनामागून आंदोलन करत आहे. नाफेडमार्फत  होणार्‍या तूर खरेदीतील घोटाळा व नाफेडची तूर खरेदीसाठी  मुदत वाढवून देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले. त्यानंतर  कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकर्‍यांसह पुन्हा विरोधी  पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. शेतमालाला कमी भाव  मिळणे, कर्जमाफी आणि आता भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्षांची  जिल्ह्यात आंदोलनाची मालिका सुरूच आहे. 

विरोधी पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीतही रसजिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी २७९ ग्रामपंचायतींच्या  निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण  भागतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ग्राम पंचायतच्या निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडल्या जाणार  असल्याने युवा वर्गांचा पुढाकार वाढला आहे. त्यामुळे  विरोधी पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साही युवा  उमेदवारांना हाताशी धरले आहे. विरोधी पक्षाकडून ग्राम पंचायत निवडणुकीतही रस दाखविला जात असून,  आंदोलनाचे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागा तही गाजत आहेत.