शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:50 IST

जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देभारनियमनाविरोधात काँग्रेसने फुंकले रणशिंग विरोधी पक्षांची जागरूकता वाढली

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान  योजनेंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; मात्र कर्जमाफीचा  लाभ घेण्यासाठी विविध अडचणींची शर्यत ठेवून अंतिम  मुदतसुद्धा १५ सप्टेंबर देण्यात आली होती. कर्जमाफीचा  लाभ प्रत्येक शेतकर्‍यांला मिळावा व त्यातील अटी शिथिल  कारण्यात याव्या यासह कर्जमाफीचे ऑनलाइन अर्जाची मुद त वाढविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व  इतर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. कर्जमाफीच्या मुद्दावरून  जिल्ह्यात विरोधकांची आक्रमकता वाढतच गेली. परिणामी  १४ सप्टेंबरला कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी २२ स प्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. कर्जमाफीनंतर आता  जिल्ह्यातील विरोधी पक्षांनी भारनियमनाचा मुद्दा उचलला  आहे. जिल्ह्यात महावितरणने भारनियमन सुरू केले असून,  शहरासह ग्रामीण भागात तासन्तास विद्युत पुरवठा खंडित  केल्या जात आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या विरोधात  जिल्ह्यात काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी  सरकारच्या निषेधार्थ जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने कंदिल  मोर्चाचा मार्ग पत्करण्यात आला आहे. विरोधी बाकावर बसून सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी  आवाज उठविण्याचे कार्य काही काळ जिल्ह्यात थंडावले  होते; मात्र आता कर्जमाफीनंतर भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्ष  वारंवार आंदोलन व मोर्चे काढून आपली विरोधी पक्षाचे  अस्तित्व टिकून ठेवत आहे. सरकारच्या विरोधात प्रश्नांमागून प्रश्न उचलले जात  असल्याने जिल्ह्यातील विरोधी पक्षांना आता आपल्या क र्तव्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विरोधकांची आंदोलनांची मालिका सुरूच!विरोधी बाकावर बसून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा  फोडण्यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात  आंदोलनामागून आंदोलन करत आहे. नाफेडमार्फत  होणार्‍या तूर खरेदीतील घोटाळा व नाफेडची तूर खरेदीसाठी  मुदत वाढवून देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले. त्यानंतर  कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकर्‍यांसह पुन्हा विरोधी  पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. शेतमालाला कमी भाव  मिळणे, कर्जमाफी आणि आता भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्षांची  जिल्ह्यात आंदोलनाची मालिका सुरूच आहे. 

विरोधी पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीतही रसजिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी २७९ ग्रामपंचायतींच्या  निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण  भागतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ग्राम पंचायतच्या निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडल्या जाणार  असल्याने युवा वर्गांचा पुढाकार वाढला आहे. त्यामुळे  विरोधी पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साही युवा  उमेदवारांना हाताशी धरले आहे. विरोधी पक्षाकडून ग्राम पंचायत निवडणुकीतही रस दाखविला जात असून,  आंदोलनाचे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागा तही गाजत आहेत.