शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:50 IST

जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देभारनियमनाविरोधात काँग्रेसने फुंकले रणशिंग विरोधी पक्षांची जागरूकता वाढली

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात  काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची  जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान  योजनेंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; मात्र कर्जमाफीचा  लाभ घेण्यासाठी विविध अडचणींची शर्यत ठेवून अंतिम  मुदतसुद्धा १५ सप्टेंबर देण्यात आली होती. कर्जमाफीचा  लाभ प्रत्येक शेतकर्‍यांला मिळावा व त्यातील अटी शिथिल  कारण्यात याव्या यासह कर्जमाफीचे ऑनलाइन अर्जाची मुद त वाढविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व  इतर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. कर्जमाफीच्या मुद्दावरून  जिल्ह्यात विरोधकांची आक्रमकता वाढतच गेली. परिणामी  १४ सप्टेंबरला कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी २२ स प्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. कर्जमाफीनंतर आता  जिल्ह्यातील विरोधी पक्षांनी भारनियमनाचा मुद्दा उचलला  आहे. जिल्ह्यात महावितरणने भारनियमन सुरू केले असून,  शहरासह ग्रामीण भागात तासन्तास विद्युत पुरवठा खंडित  केल्या जात आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या विरोधात  जिल्ह्यात काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी  सरकारच्या निषेधार्थ जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने कंदिल  मोर्चाचा मार्ग पत्करण्यात आला आहे. विरोधी बाकावर बसून सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी  आवाज उठविण्याचे कार्य काही काळ जिल्ह्यात थंडावले  होते; मात्र आता कर्जमाफीनंतर भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्ष  वारंवार आंदोलन व मोर्चे काढून आपली विरोधी पक्षाचे  अस्तित्व टिकून ठेवत आहे. सरकारच्या विरोधात प्रश्नांमागून प्रश्न उचलले जात  असल्याने जिल्ह्यातील विरोधी पक्षांना आता आपल्या क र्तव्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात विरोधकांची आंदोलनांची मालिका सुरूच!विरोधी बाकावर बसून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा  फोडण्यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात  आंदोलनामागून आंदोलन करत आहे. नाफेडमार्फत  होणार्‍या तूर खरेदीतील घोटाळा व नाफेडची तूर खरेदीसाठी  मुदत वाढवून देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले. त्यानंतर  कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकर्‍यांसह पुन्हा विरोधी  पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. शेतमालाला कमी भाव  मिळणे, कर्जमाफी आणि आता भारनियमन व पेट्रोल-डिझेल  दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्षांची  जिल्ह्यात आंदोलनाची मालिका सुरूच आहे. 

विरोधी पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीतही रसजिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी २७९ ग्रामपंचायतींच्या  निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण  भागतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ग्राम पंचायतच्या निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडल्या जाणार  असल्याने युवा वर्गांचा पुढाकार वाढला आहे. त्यामुळे  विरोधी पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साही युवा  उमेदवारांना हाताशी धरले आहे. विरोधी पक्षाकडून ग्राम पंचायत निवडणुकीतही रस दाखविला जात असून,  आंदोलनाचे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागा तही गाजत आहेत.