शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

By admin | Updated: June 19, 2017 04:27 IST

एसएमएस सुविधा; बुलडाणा जिल्ह्यातील ५0 हजार शेतक-यांना लाभ.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याच वेळा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना हे नुकसान टाळता येणार आहे. यात एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना हवामानाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना मिळत आहे.शासनाच्या किसान एसएमएस सेवातून मोबाइलवर मोफत एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना शेतीसल्ला दिला जातो. राज्यात २0१३ मध्ये ही सेवा चालू झाल्यानंतर डिसेंबर २0१३ अखेर ६ लाख ५0 हजार एवढी नोंदणी होती. जुलै २0१४ अखेर ८ लाख ५0 हजार एवढी झाली. २0१५ मध्ये राज्यात सुमारे १५ लाख ४१ हजार ३९८, तर मार्च २0१६ पर्यंंंत हा आकडा २0 लाख होता. आता २0१७ मध्ये लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ४५ लाखांवर पोहचला आहे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, हवामान विभाग व फलोत्पादन या विभागांमार्फत मोफत एसएमएसद्वारा शेतकर्‍यांना कृषी सल्ला मिळतो. आता केंद्राच्या किसान एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती मिळत आहे, तर जुलै २0१७ पासून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानाची माहितीही प्राप्त होणार आहे. यामुळे खरीप व रब्बी पेरणी करताना मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात शेतक-यांना मिळणार लाभविविध योजनांचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मोबाइल नंबर नियमित घेतले जातात. त्यामुळे ३0 हजार ६५७ एवढय़ा शेतकर्‍यांना मोफत एसएमएस कृषी सल्ला दिला जात होता. जिल्ह्यात २0१६-१७ मध्ये १९ हजार ३४३ शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता किसान एसएमएस सेवा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज समजणार आहे.प्रत्येक १0 मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १0 मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकर्‍यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.