शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

By admin | Updated: June 19, 2017 04:27 IST

एसएमएस सुविधा; बुलडाणा जिल्ह्यातील ५0 हजार शेतक-यांना लाभ.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याच वेळा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना हे नुकसान टाळता येणार आहे. यात एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना हवामानाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना मिळत आहे.शासनाच्या किसान एसएमएस सेवातून मोबाइलवर मोफत एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना शेतीसल्ला दिला जातो. राज्यात २0१३ मध्ये ही सेवा चालू झाल्यानंतर डिसेंबर २0१३ अखेर ६ लाख ५0 हजार एवढी नोंदणी होती. जुलै २0१४ अखेर ८ लाख ५0 हजार एवढी झाली. २0१५ मध्ये राज्यात सुमारे १५ लाख ४१ हजार ३९८, तर मार्च २0१६ पर्यंंंत हा आकडा २0 लाख होता. आता २0१७ मध्ये लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ४५ लाखांवर पोहचला आहे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, हवामान विभाग व फलोत्पादन या विभागांमार्फत मोफत एसएमएसद्वारा शेतकर्‍यांना कृषी सल्ला मिळतो. आता केंद्राच्या किसान एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती मिळत आहे, तर जुलै २0१७ पासून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानाची माहितीही प्राप्त होणार आहे. यामुळे खरीप व रब्बी पेरणी करताना मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात शेतक-यांना मिळणार लाभविविध योजनांचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मोबाइल नंबर नियमित घेतले जातात. त्यामुळे ३0 हजार ६५७ एवढय़ा शेतकर्‍यांना मोफत एसएमएस कृषी सल्ला दिला जात होता. जिल्ह्यात २0१६-१७ मध्ये १९ हजार ३४३ शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता किसान एसएमएस सेवा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज समजणार आहे.प्रत्येक १0 मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १0 मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकर्‍यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.