शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वानखेड येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 19, 2017 00:32 IST

जलपातळी खालावल्याने पाणीपुरवठा लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवानखेड : यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्ह तापत असल्यामुळे त्याचा परिणाम गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतावर होवून पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे मे महिन्यातील कडक उष्णतामानात वानखेड येथे भीषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येमुळे गावात आठवड्यातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास ह्याहीपेक्षा पाण्याची समस्या बिकट होवू शकते. यावर उपाय म्हणून गावाजवळील शेतामधून विहिर अधिग्रहीत करून त्याव्दारे गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. ह्याबाबत सविस्तर असे की, संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वानखेड गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या जवळपास आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तीन बोअरवेल व एका मोठ्या विहिरीव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून कडक उन्ह तापत असल्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पाण्याची पातळी खोलवर तळाशी गेल्यामुळे पाणी पुरवठा आठ दिवसातुन एक वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाल्यामुळे १७ मे रोजी वार्ड क्र.४ व ५ मधील महिला नागरीकांनी ग्रामपंचायतमध्ये येवून पाणी समस्येबाबत विचारणा करून पाणी समस्या त्वरीत सोडवा अशी मागणी केली. तर दोन-तीन दिवसात गावाजवळ असलेल्या एका बोअरवेलमध्ये इलेक्ट्रीक मोटार बसविली जावून त्यावरून पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच इतरही पर्याय निवडून सर्वांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सरपंच अंजना सोळंके, ग्रामसेवक धनावडे ग्रामसेवक यांनी सांगितले.