शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

करडी धरणातून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: October 3, 2015 02:33 IST

अधिका-यांचे दुर्लक्ष ; धरणाच्या गेटच्या रबरशीटची दुरवस्था.

नागेश मोहिते / धाड: नुकत्याच झालेल्या पावसामुळे स्थानिक करडी संग्राहक धरणात सध्या मोठय़ा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे; मात्र धरणाच्या गेटची रबरशीट खराब झाल्यामुळे धरणातून दररोज मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून वाया जात आहे. शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पुरेसे पाणी राहील, याची शाश्‍वती राहिली नाही, याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण पावसाळ्यात वरुणराजाची वक्रदृष्टी राहिली. परतीच्या पावसाने शेतकर्‍यांवर कृपा केल्याने कधी नव्हे ते नदी-नाल्यांना पाणी वाहताना दिसले. यामुळे करडी संग्राहक धरणात अंदाजे साधारण २.३0 दशलक्ष धनमीटर पाणी साचलेले आहे. परिसरातील शेती सिंचनासाठी धरणाची निर्मिती असली तरी धाडसह करडी, बोरखेड, सावळी, चांडोळ, कुलमखेड, सातगाव, कुंबेफळ, टाकळी, डोमरुळ या गावांना धरणाचे परिक्षेत्रातील विहिरीमधून बारमाही पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो. करडी धरणाला असलेल्या ३२ दरवाज्यांना रबरशीट बसवण्यात आल्या आहेत. रबरशीट खराब असल्यामुळे सध्या धरणाचे गेटमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उत्सर्ग होऊन ते पाणी वाहून वाया जात असताना संबंधित लघू पाटबंधारे विभागाचे या बाबीवर लक्ष दिसत नाही. मुळात शेतकरी दृष्काळाच्या झळा सोसत असताना मौल्यवान जलसाठा वाहून वाया जात असून, येत्या काळात शेतीसिंचनासह पिण्याचे पाण्याची समस्या उद्भवणार, हे निश्‍चित आहे. यावर्षी खरीप हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यातच रब्बी हंगामाची तयारी शेतकर्‍यांनी केली असून, सिंचनासाठी पाण्याची गरज पडणार आहे.