शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST

पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील पाच गावांना टँकरने पाणीपुरवठानऊ गावातील विहीर अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.मेहकर तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होत  असते; मात्र यावर्षी पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवत आहे.  पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला  आहे; परंतु तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. नदी,  नाले, विहीर, तलाव, धरण अद्याप कोरडेच आहेत. पाण्याची पातळी  समाधानकारक नाही. ग्रामीण भागात अनेक गावात पाणीटंचाई  निर्माण होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी  अनेक गावातून प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत.  पावसाळ्याच्या दिवसातच जर तालुक्यात पाण्याची अशी गंभीर  परिस्थिती आहे, तर भविष्यात काय स्थिती असेल? मेहकर तालुक्यात  दुर्गबोरी, घुटी, पार्डी, वरवंड, बोथा या गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा  सुरू आहे. तर शेंदला, लोणीकाळे, निंबा, बार्डा, दुर्गबोरी, घुटी, पार्डी,  वरवंड, बोथा या गावच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.