शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्हा प्रयाेगशाळेत पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ ...

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. मात्र, अनेक भागातील पाण्याची तपासणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांना आपले पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची माहिती मिळत नाही.

बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून २७ वार्डांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येते. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून १२ पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. प्रत्येक साेमवारी वेगवेगळ्या प्रभागातून पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. यामध्ये अनेक प्रभागांचा क्रमांक उशिराने लागत असल्याने त्या भागातील नागरिकांना पाणी दूषित आहे किंवा नाही याची माहितीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाययाेजना करण्यात येतात. दूषित पाणी असल्यास लिकेज काढून पुन्हा त्या पाण्याची तपासणी करण्यात येते. नगरपालिकेच्या वतीने एकाच प्रभागातून १२ नमुने गाेळा करण्यात येतात. त्यामुळे इतर प्रभागातील पाण्याचे काय असा प्रश्न उपस्थित हाेताे. त्यामुळे प्रत्येक भागातून नियमित पाण्याचे नमुने घेतल्यास पाण्याविषयी माहिती मिळेल व त्यावर नगरपालिकेला उपाययाेजना करता येतील.

एका प्रभागातून घेतले जातात १२ नमुने

नगरपालिकेच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून नागरिकांच्या घरात आलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. महिनाभरात ४० नमुने घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने जवळपास ४८ नमुने घेण्यात येऊन ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहराचा व्याप माेठा असल्याने एका प्रभागातून नमुने घेतल्यानंतर शेवटच्या प्रभाग संपेपर्यंत बराच विलंब हाेताे. त्यामुळे यादरम्यान तेथे दूषित पाणीपुरवठा हाेण्याची शक्यता असते.

अशी हाेते तपासणी

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गाेळा करण्यात येतात.

गाेळा केलेले नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयाेगशाळेत पाठवण्यात येतात.

नागरिकांना पुरवठा केलेले पाणी दूषित आहे किंवा शुद्ध आहे याचा अहवाल आल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने उपाययाेजना करण्यात येतात. नमुने घेण्यास विलंब हाेत असल्याने अनेक वेळा माहिती उशिरा मिळते.