शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

जिल्हा प्रयाेगशाळेत पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ ...

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. मात्र, अनेक भागातील पाण्याची तपासणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांना आपले पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची माहिती मिळत नाही.

बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून २७ वार्डांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येते. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून १२ पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. प्रत्येक साेमवारी वेगवेगळ्या प्रभागातून पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. यामध्ये अनेक प्रभागांचा क्रमांक उशिराने लागत असल्याने त्या भागातील नागरिकांना पाणी दूषित आहे किंवा नाही याची माहितीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाययाेजना करण्यात येतात. दूषित पाणी असल्यास लिकेज काढून पुन्हा त्या पाण्याची तपासणी करण्यात येते. नगरपालिकेच्या वतीने एकाच प्रभागातून १२ नमुने गाेळा करण्यात येतात. त्यामुळे इतर प्रभागातील पाण्याचे काय असा प्रश्न उपस्थित हाेताे. त्यामुळे प्रत्येक भागातून नियमित पाण्याचे नमुने घेतल्यास पाण्याविषयी माहिती मिळेल व त्यावर नगरपालिकेला उपाययाेजना करता येतील.

एका प्रभागातून घेतले जातात १२ नमुने

नगरपालिकेच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून नागरिकांच्या घरात आलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. महिनाभरात ४० नमुने घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने जवळपास ४८ नमुने घेण्यात येऊन ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहराचा व्याप माेठा असल्याने एका प्रभागातून नमुने घेतल्यानंतर शेवटच्या प्रभाग संपेपर्यंत बराच विलंब हाेताे. त्यामुळे यादरम्यान तेथे दूषित पाणीपुरवठा हाेण्याची शक्यता असते.

अशी हाेते तपासणी

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गाेळा करण्यात येतात.

गाेळा केलेले नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयाेगशाळेत पाठवण्यात येतात.

नागरिकांना पुरवठा केलेले पाणी दूषित आहे किंवा शुद्ध आहे याचा अहवाल आल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने उपाययाेजना करण्यात येतात. नमुने घेण्यास विलंब हाेत असल्याने अनेक वेळा माहिती उशिरा मिळते.