शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

जिल्हा प्रयाेगशाळेत पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ ...

बुलडाणा : शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र याेजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येताे. प्रभागात झालेल्या पाणी पुरवठ्याने दर साेमवारी १२ नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. मात्र, अनेक भागातील पाण्याची तपासणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांना आपले पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची माहिती मिळत नाही.

बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून २७ वार्डांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येते. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून १२ पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. प्रत्येक साेमवारी वेगवेगळ्या प्रभागातून पाण्याचे नमुने गाेळा करण्यात येतात. यामध्ये अनेक प्रभागांचा क्रमांक उशिराने लागत असल्याने त्या भागातील नागरिकांना पाणी दूषित आहे किंवा नाही याची माहितीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने गाेळा करून ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाययाेजना करण्यात येतात. दूषित पाणी असल्यास लिकेज काढून पुन्हा त्या पाण्याची तपासणी करण्यात येते. नगरपालिकेच्या वतीने एकाच प्रभागातून १२ नमुने गाेळा करण्यात येतात. त्यामुळे इतर प्रभागातील पाण्याचे काय असा प्रश्न उपस्थित हाेताे. त्यामुळे प्रत्येक भागातून नियमित पाण्याचे नमुने घेतल्यास पाण्याविषयी माहिती मिळेल व त्यावर नगरपालिकेला उपाययाेजना करता येतील.

एका प्रभागातून घेतले जातात १२ नमुने

नगरपालिकेच्या वतीने दर साेमवारी एका प्रभागातून नागरिकांच्या घरात आलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. महिनाभरात ४० नमुने घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने जवळपास ४८ नमुने घेण्यात येऊन ते जिल्हा प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहराचा व्याप माेठा असल्याने एका प्रभागातून नमुने घेतल्यानंतर शेवटच्या प्रभाग संपेपर्यंत बराच विलंब हाेताे. त्यामुळे यादरम्यान तेथे दूषित पाणीपुरवठा हाेण्याची शक्यता असते.

अशी हाेते तपासणी

नागरिकांच्या घरी आलेल्या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गाेळा करण्यात येतात.

गाेळा केलेले नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयाेगशाळेत पाठवण्यात येतात.

नागरिकांना पुरवठा केलेले पाणी दूषित आहे किंवा शुद्ध आहे याचा अहवाल आल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने उपाययाेजना करण्यात येतात. नमुने घेण्यास विलंब हाेत असल्याने अनेक वेळा माहिती उशिरा मिळते.