शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

शुद्धीकरण न होताच होतो पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST

लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या  पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात  जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले!पाण्याचे नमुने गोळा करून तपासणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या  पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात  जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हास्तरीय पथक तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी गावांतील  पाणीपुरवठा योजना, स्रोतातून नमुने गोळा करून त्याची त पासणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत केली पाहिजे.  पाणी नमुने तसेच ब्लिचिंग पावडरचीही तपासणी झाली पाहिजे;  परंतु आरोग्य विभागाकडून कुठल्याच प्रकारची तपासणी होत  नसल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.  ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता कमालीची घसरलेली असल्यामुळे  त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण २0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे  दिसून येते. तसेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच  उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्याच्या  दिवसात ग्रामस्थांना ब्लिचिंग पावडरने निर्जंंतूक केलेल्या शुद्ध  पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत  आहे.

या गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठालोणार तालुक्यातील  वझर आघाव, खापरखेड, खळेगाव,  शिवनी जाट, पार्डी सिरसाट गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत  असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे या गावांमध्ये  सातत्याने जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.  त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, हगवण, अतिसार,  विषमज्वर या आजारांच्या रोग्यांचा समावेश आहे. या  आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे निर्देश  देण्यात आले आहेत. 

पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांपासून ग्रामस्थांचे  रक्षण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश  देण्यात आले. गावात शुद्ध पाणीपुरवठा झाल्यास या रोगांना प्र ितबंध होतो.- डॉ.अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.