शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

माेटार पंप जळाल्याने माेताळा शहराचा पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारा माेटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या ...

मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारा माेटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ जूनपासून ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले हाेते. नगरपंचायतच्या वतीने मिळालेल्या लेखी आश्वासनाने हे ठिय्या आंदाेलन मागे घेण्यात आले़

शहरातील लोकसंख्येने दहा हजारांचा आकडा केव्हाचाच पार केला आहे. शहराला येथील नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु नगरपंचायतमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने येथे आठवड्यातून एकाच दिवशी शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वास्तविक पाहता येथील नगरपंचायत प्रशासनाने नियोजन केल्यास शहराला आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो; परंतु नियोजनाअभावी ते शक्य होत नाही. त्यातच मोटार पंप जळून पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणारे मोटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानादेखील शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माेताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी दाेन दिवसांत माेटार दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे घाटे यांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतले.

एकाच माेटार पंपाने पाणीपुरवठा

ग्रामपंचायत काळापासून एकाच मोटार पंपावरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील नगरपंचायत प्रशासनाने शहरासाठी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. जेणेकरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपात काही बिघाड झाल्यास; अथवा मोटार पंप जळाल्यास शहरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करता आला असता, यासाठी मागील काळात येथील नागरिकांनी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करण्याची मागणीदेखील केली आहे; परंतु नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही़

पिवळसर पाण्याचा पुरवठा

शहराला नगरपंचायतीमार्फत होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नळाद्वारे पिवळसर रंगाचा, तसेच जंतुयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे धरणातून येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सरळ-सरळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा हा अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देत आहे.