शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

माेटार पंप जळाल्याने माेताळा शहराचा पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारा माेटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या ...

मोताळा : शहराला पाणीपुरवठा करणारा माेटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ जूनपासून ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले हाेते. नगरपंचायतच्या वतीने मिळालेल्या लेखी आश्वासनाने हे ठिय्या आंदाेलन मागे घेण्यात आले़

शहरातील लोकसंख्येने दहा हजारांचा आकडा केव्हाचाच पार केला आहे. शहराला येथील नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु नगरपंचायतमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने येथे आठवड्यातून एकाच दिवशी शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वास्तविक पाहता येथील नगरपंचायत प्रशासनाने नियोजन केल्यास शहराला आठवड्यातून दोन वेळा नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो; परंतु नियोजनाअभावी ते शक्य होत नाही. त्यातच मोटार पंप जळून पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणारे मोटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानादेखील शहरवासीयांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माेताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी दाेन दिवसांत माेटार दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे घाटे यांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतले.

एकाच माेटार पंपाने पाणीपुरवठा

ग्रामपंचायत काळापासून एकाच मोटार पंपावरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील नगरपंचायत प्रशासनाने शहरासाठी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. जेणेकरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपात काही बिघाड झाल्यास; अथवा मोटार पंप जळाल्यास शहरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करता आला असता, यासाठी मागील काळात येथील नागरिकांनी अतिरिक्त मोटार पंपाची व्यवस्था करण्याची मागणीदेखील केली आहे; परंतु नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही़

पिवळसर पाण्याचा पुरवठा

शहराला नगरपंचायतीमार्फत होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नळाद्वारे पिवळसर रंगाचा, तसेच जंतुयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे धरणातून येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सरळ-सरळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा हा अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देत आहे.