शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोणार शहरात आता दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: June 16, 2014 00:50 IST

पाणीपुरवठा योजनेला गती आली असून आता लोणारकरांच्या नळाला २ वेळेस पाणीपुरवठा होणार आहे.

लोणार : ग्रामपंचायतकालीन योजनेवरुन होणार्‍या पाणीपुरवठय़ामुळे गेल्या २0 वर्षापासून लोणार शहर पाणीटंचाईच्या झळा सोसत आले आहे. येथील पाणीपुरवठा योजनेला गती आली असून आता लोणारकरांच्या नळाला २ वेळेस पाणीपुरवठा होणार आहे. १९ जून रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व ऊर्जा मंत्री राजेंद्र मुळक यांच्याहस्ते येथील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. येथील खार्‍या पाण्याच्या सरोवरामुळे जागतिक वारसा लाभलेल्या लोणार शहरातील नागरिकांना २0 वर्षापासून ग्रामपंचायती कालीन योजनेवरुनच पाणीपुरवठा सुरु आहे. शहरातील नागरिकांना यामुळे २0 वर्षापासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लोणार करांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी व शहरवासियांना नियमीत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता सन २00७ मध्ये नगर पालीकेने उपाध्यक्ष राजेश मापारी यांनी महाराष्ट्र शासनाकडून सुजल निर्मल योजनेअंतर्गत बोरखेडी पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटी रुपये मंजुर करुन आणले. मात्र योजनेसाठी लोकवर्गीची अट असल्यामुळे योजनेला तांत्रिक मंजुरात मिळू शकली नाही. त्यानंतर २00९ मध्ये पार पडलेल्या लोणार न.प.च्या निवडणुकीत शहरवासियांनी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात कौल देत नगर पालीका सेनेच्या ताब्यात दिली. गत पाच वर्षात माजी नगराध्यक्ष प्रा.बळीराम मापारी यांनी खा.प्रतापराव जाधव आणि आ.संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून योजनेचा पाठपुरावा करुन योजनेला तांत्रिक मंजुरात मिळवून घेतली. तसेच नळयोजनेच्या सुधारीत कामांसाठी ५0 लक्ष रुपयांचा प्रथम हप्ताही शासनाकडून मंजूर करुन आणला. मात्र पुन्हा मार्च २0१४ मध्ये पार पडलेल्या न.प.च्या निवडणुकीत शहरवासियांनी सत्ताधारी सेनेच्या विरोधात कौल देत १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे निवडून दिले. बहुमताने न.प.वर काँग्रेसचा तिरंगा फडकविला. काँग्रेसनेही नगराध्यक्षपदाची माळ सौ.रंजना राजेश मापारी यांच्या गळ्यात टाकली. ज्या राजेश मापारी यांनी २00७ मध्ये शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी सुजल निर्मल योजना मंजूर करुन आणली त्याच योजनेचे काम त्याच्याच कार्यकाळात पुर्णत्वास जात आहे. हे विशेष! तिर्थक्षेत्र आळंदीच्या पाणीरुवठा योजनेच्या लोकवर्गणीची अट ज्याप्रमाणे शासनाने रद्द केली त्याच धर्तीवर लोणारचीही लोकवर्गणीची अट रद्द झाली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती प्राप्त झाली असून १९ जून रोजी जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपुजन तसेच मुख्य पाण्याच्या टाकीसह गावातील इतर ३ पाण्याच्या टाकीेचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. जलशुदीकरण केंद्रासह विविध कामांच्या भूमिपुजनास राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, उर्जामंत्री राजेंद्र मुळक, आ.दिलीप सानंदा, आ.राहूल बोंद्रे, आ.अमित झनक, जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, केंद्र व राज्य सनियंत्रण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, जि.प.बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे, सौ.मायाताई चव्हाण उपस्थित राहणार आहेत.