शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राताळी येथील पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या राताळी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसांपासून जळाले आहे़ त्यामुळे, गावातील पाणीपुरवठा ...

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या राताळी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसांपासून जळाले आहे़ त्यामुळे, गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे़ जळालेेले राेहित्र तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे़

राताळी येथील रोहित्र नेहमी-नेहमी जळण्याचे सत्र सुरूच असून गेल्या आठ दिवसांपासून येथील रोहित्र पुन्हा जळाल्याने नागरिकांना कडक निर्बंधांच्या काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे रोहित्र जळाल्याने गाव अंधारात बुडाले असून गावाला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिठाच्या गिरण्याही बंद झाल्याने रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राताळी येथे गावठाणातील दलित वस्तीमधील आणखी एक रोहित्र मंजूर आहे. ते आणखी एक मंजूर रोहित्र जर मिळाले तर सदर रोहित्रावरील दाब कमी होऊन रोहित्र जळण्याची समस्या राहणार नाही, असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास लव्हाळे यांनी व्यक्त केले आहे. रोहित्र जळाल्याने गावात पाणीपुरवठा बंद, पिठाची गिरणी बंद, टी.व्ही. बंद, जनावरांना पाणी पाजण्याची गैरसोय होत असून दुसरीकडे निर्बंध़ त्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तेव्हा लवकरात लवकर हे जळालेले रोहित्र बदलून मिळावे व मंजूर असलेले आणखी एक रोहित्र लवकरात लवकर बसवून जुन्या रोहित्रावरील दाब कमी करावा, अशी मागणी राताळी येथील सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी वीजवितरण अधिकारी यांना केली आहे.