शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

बुलडाणा तालुक्यात ९ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:49 IST

Water scarcity in Buldhana : यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असून ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सुमारे २ लाख १९ हजार लोकसंख्या असलेल्या बुलडाणा तालुक्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असून ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, १७ गावांतील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पैनगंगा नदीचा उगम असलेल्या व काळ्या पाषाणाचा भाग असलेल्या तालुक्यातील या नदी क्षेत्रालगतच्या भागात प्रामुख्याने टंचाईची दरवर्षी तीव्रता जाणवत असते. त्यातच मधल्या काळात या पैनगंगा नदीवर १ दलघमी क्षमतेचे ८ मायनर टँक उभारण्यात आल्याने अलीकडील काळात या भागातील टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यात यावर्षी तीन गावांची भर पडली आहे.बुलडाणा तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १ कोटी ९८ लाख रुपयांचा आहे. यावर्षी तालुक्यातील ९६ गावांपैकी ५६ गावांना टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. विहीर अधिग्रहणासाठी यंदा २८ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रसंगी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता पंचायत समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यातील यावर्षी किमान १३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापैकी सध्या ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.

२५ गावात विंधन विहिरी प्रस्तावितबुलडाणा तालुक्यातील ९६ गावांपैकी २५ गावांमध्ये यावर्षी विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अद्याप त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पावले टाकली गेली नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. विंधन विहिरीसाठी यंदा तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठासध्या बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, देव्हारी, पिंपरखेड, सावळा, सुंदरखेड आणि भादोला या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरसाठीच यंदाच्या कृती आराखड्यात सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई