शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

नदीकाठच्या गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 00:36 IST

खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे!

राहेरी : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जरी पावसाळा जास्त झाला असला, तरी एप्रिलच्या सुरुवातीला संपूर्ण नदी काठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खडकपूर्णा नदीपात्र मार्चच्या सुरुवातीलाच कोरडे पडले होते. हळूहळू पूर्ण पाणी नाहिसे झाले असता नदीकाठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.अनेक नदीकाठच्या जवळपास ४० ग्रामपंचायतींनी पाणी सोडण्यात यावे, असे ठरावसुद्धा पाठविलेले आहेत. ग्रामपंचायतलासुद्धा पाणी पुरविण्यास नदीपात्रात पाणी नसल्यामुळे अपयश येत आहे. गावकऱ्यालासुद्धा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील विहिरी पण कोरड्या पडत चालल्या आहेत. हातपंपसुद्धा बंद पडले आहेत. त्याचबरोबर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर भुईमूग, ऊस, कांदा लागवड केलेली आहे. परंतु संपूर्ण उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येत होते. यावर्षी खडकपूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परिसरातील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे, की, खडकपूर्णा नदी पात्रात पाणी सोडायचे नसेल, तर आधी सूचना देण्यात यायला पाहिजे होत्या. तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या नाही. खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही, तर हजारो हेक्टर वरील कांदा, ऊस, उन्हाळी भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहेरी बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. ----------खडकपूर्णा नदीपात्रात शंभर टक्के पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, राहेरी बु. येथील पुलाचे काम झाल्यानंतर ९ तारखेनंतर पाणी सुटणारच आहे. - आ.डॉ. शशिकांत खेडेकर, सिंदखेड राजा.----------खडकपूर्णा नदीमध्ये धरणाचे पाणी लवकर सोडण्यात यावे. जवळपास ४० ग्रा.पं.मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नदीला लवकर पाणी सोडले तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.- मालतीबाई देशमुख, राहेरी बु.