शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

नदीकाठच्या गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 00:36 IST

खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे!

राहेरी : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जरी पावसाळा जास्त झाला असला, तरी एप्रिलच्या सुरुवातीला संपूर्ण नदी काठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खडकपूर्णा नदीपात्र मार्चच्या सुरुवातीलाच कोरडे पडले होते. हळूहळू पूर्ण पाणी नाहिसे झाले असता नदीकाठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.अनेक नदीकाठच्या जवळपास ४० ग्रामपंचायतींनी पाणी सोडण्यात यावे, असे ठरावसुद्धा पाठविलेले आहेत. ग्रामपंचायतलासुद्धा पाणी पुरविण्यास नदीपात्रात पाणी नसल्यामुळे अपयश येत आहे. गावकऱ्यालासुद्धा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील विहिरी पण कोरड्या पडत चालल्या आहेत. हातपंपसुद्धा बंद पडले आहेत. त्याचबरोबर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर भुईमूग, ऊस, कांदा लागवड केलेली आहे. परंतु संपूर्ण उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येत होते. यावर्षी खडकपूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परिसरातील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे, की, खडकपूर्णा नदी पात्रात पाणी सोडायचे नसेल, तर आधी सूचना देण्यात यायला पाहिजे होत्या. तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या नाही. खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही, तर हजारो हेक्टर वरील कांदा, ऊस, उन्हाळी भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहेरी बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. ----------खडकपूर्णा नदीपात्रात शंभर टक्के पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, राहेरी बु. येथील पुलाचे काम झाल्यानंतर ९ तारखेनंतर पाणी सुटणारच आहे. - आ.डॉ. शशिकांत खेडेकर, सिंदखेड राजा.----------खडकपूर्णा नदीमध्ये धरणाचे पाणी लवकर सोडण्यात यावे. जवळपास ४० ग्रा.पं.मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नदीला लवकर पाणी सोडले तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.- मालतीबाई देशमुख, राहेरी बु.