शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

नदीकाठच्या गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 00:36 IST

खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे!

राहेरी : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जरी पावसाळा जास्त झाला असला, तरी एप्रिलच्या सुरुवातीला संपूर्ण नदी काठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खडकपूर्णा नदीपात्र मार्चच्या सुरुवातीलाच कोरडे पडले होते. हळूहळू पूर्ण पाणी नाहिसे झाले असता नदीकाठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.अनेक नदीकाठच्या जवळपास ४० ग्रामपंचायतींनी पाणी सोडण्यात यावे, असे ठरावसुद्धा पाठविलेले आहेत. ग्रामपंचायतलासुद्धा पाणी पुरविण्यास नदीपात्रात पाणी नसल्यामुळे अपयश येत आहे. गावकऱ्यालासुद्धा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील विहिरी पण कोरड्या पडत चालल्या आहेत. हातपंपसुद्धा बंद पडले आहेत. त्याचबरोबर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर भुईमूग, ऊस, कांदा लागवड केलेली आहे. परंतु संपूर्ण उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येत होते. यावर्षी खडकपूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परिसरातील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे, की, खडकपूर्णा नदी पात्रात पाणी सोडायचे नसेल, तर आधी सूचना देण्यात यायला पाहिजे होत्या. तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या नाही. खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही, तर हजारो हेक्टर वरील कांदा, ऊस, उन्हाळी भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहेरी बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. ----------खडकपूर्णा नदीपात्रात शंभर टक्के पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, राहेरी बु. येथील पुलाचे काम झाल्यानंतर ९ तारखेनंतर पाणी सुटणारच आहे. - आ.डॉ. शशिकांत खेडेकर, सिंदखेड राजा.----------खडकपूर्णा नदीमध्ये धरणाचे पाणी लवकर सोडण्यात यावे. जवळपास ४० ग्रा.पं.मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नदीला लवकर पाणी सोडले तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.- मालतीबाई देशमुख, राहेरी बु.