शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

वन क्षेत्रातील पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: April 14, 2017 00:08 IST

बुलडाणा- वन क्षेत्रातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, यंदा पाणवठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

कृत्रिम पाणवठ्यांमध्ये दुपटीने वाढ

बुलडाणा : जिल्ह्यातील वन क्षेत्रामधील प्राण्यांना उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन क्षेत्रातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, यंदा पाणवठ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. २०१६ मध्ये सातही वन परिक्षेत्रात ४४ कृत्रिम पाणवठे होते. मात्र २०१७ मध्ये पाणवठ्याची संख्या वाढवून ८१ करण्यात आली आहे.जिल्ह्यातील वन परिक्षेत्रालगत ३२ बारमाही तलाव व ६४ नैसर्गिक पाणवठे आहेत. यातून वन्य जीवांना सर्वभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र उन्हाळ्याच्या झळा सुरू होताच त्याचा फटका वन क्षेत्रात बसला आहे. परिणामी यंदा जळगाव जा. मोताळा, खामगाव, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर व घाटबोरी वन क्षेत्रातील ६४ नैसर्गिक पाणवठे आटले आहेत.या परिस्थितीत वन विभागाकडून वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वन क्षेत्रात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे केवळ ४४ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, यंदा पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, वन्य प्राण्यांसाठी तब्बल ८१ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ६१ पाणवठ्यातील गाळ काढला!जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांतून वन्य जीवांना बारामही पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सातही वन क्षेत्रातील ६१ नैसर्गिक पाणवठ्यातील गाळ करण्यात आला होतो. जळगाव जमोद वन क्षेत्रातील १९ पाणवठे, मोताळातील सात, खामगाव सात, बुलडाणा १३, देऊळगाव राजा तीन आणि घाटबोरी वन क्षेत्रातील १२ नैसर्गिक पाणवठ्यांचा समावेश आहे.