शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ांमधील पाणी आरक्षण जाहीर!

By admin | Updated: October 29, 2016 02:43 IST

नळगंगा प्रकल्पातील २.९५२ दलघमी पाणी आरक्षित.

बुलडाणा, दि. २८- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे माघारी मॉन्सूननेसुद्धा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नळगंगा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठय़ामधून बाष्पीभवन व अन्य व्यय वगळता उपलब्ध पाणीसाठय़ामधून रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पाणी आरक्षण समितीने जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदर आरक्षण घोषित केले आहे. या सभेला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनकुसरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके घेण्यासाठी पाणी देण्यात यावे. पाणी वापर संस्थांच्या मागणीप्रमाणे पाण्याचे आरक्षण करावे. संस्था व नगर परिषद यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ पूर्वी थकबाकी जमा करावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. गरज नसताना बर्‍याच ग्रामपंचायती व नगर परिषदा पिण्याचे पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची मागणी करतात; मात्र प्रत्यक्षात पाणी वापर करीत नाही. त्यामुळे ओलितासाठी पाणी वापर होत नसून, हे पाणी बाष्पीभवन होऊन नष्ट होते.उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामात जास्तीत जास्त पीक घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले.