शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जलसाठय़ांमधील पाणी आरक्षण जाहीर!

By admin | Updated: October 29, 2016 02:43 IST

नळगंगा प्रकल्पातील २.९५२ दलघमी पाणी आरक्षित.

बुलडाणा, दि. २८- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे माघारी मॉन्सूननेसुद्धा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नळगंगा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठय़ामधून बाष्पीभवन व अन्य व्यय वगळता उपलब्ध पाणीसाठय़ामधून रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पाणी आरक्षण समितीने जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदर आरक्षण घोषित केले आहे. या सभेला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनकुसरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके घेण्यासाठी पाणी देण्यात यावे. पाणी वापर संस्थांच्या मागणीप्रमाणे पाण्याचे आरक्षण करावे. संस्था व नगर परिषद यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ पूर्वी थकबाकी जमा करावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. गरज नसताना बर्‍याच ग्रामपंचायती व नगर परिषदा पिण्याचे पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची मागणी करतात; मात्र प्रत्यक्षात पाणी वापर करीत नाही. त्यामुळे ओलितासाठी पाणी वापर होत नसून, हे पाणी बाष्पीभवन होऊन नष्ट होते.उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामात जास्तीत जास्त पीक घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले.