शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

स्वच्छतेवर ‘लोटाधारीं’चे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:25 IST

शहर हगणदरीमुक्तीचे स्वप्न भंगणार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका जंगजंग पछाडत असताना पालिकेच्या या प्रयत्नांवर ‘लोटाधारी’ पाणी फेरत असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले. यासंदर्भात ‘लोकमत’च्या चमूने मंगळवारी पाहणी केले असता बाळापूर फ ैल, चांदमारी, किसन नगर आदी भागातील मैदानेच नव्हे, तर पालिकेचे नवनिर्मित भाजी मार्केटही नागरिकांनी सोडलेले नसल्याचे दिसून आले. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलेले आहे. या अभियानांतर्गत शहरे हगणदीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात खामगाव नगरपालिकेने सहभागी होत शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शासनाने ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा नागरिकांना कोणत्याही अटी न घालता शौचालय बांधकामाकरिता प्रत्येकी १८ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार खामगाव पालिकेने अनेक लाभार्थींना अनुदानसुद्धा उपलब्ध करून दिले; परंतु शासनाकडून अनुदान घेऊनही अनेक लाभार्थींनी शौचालयांचे बांधकाम केलेच नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे खामगाव शहर ‘हगणदरीमुक्त’ करण्याचा पालिकेचा प्रयत्न फोल ठरत असून, पालिकेच्या प्रयत्नांवर लोटा घेऊन बाहेर जाणाऱ्यांकडून पाणी फेरले जात आहे. उघड्यावर शौचास जाऊन घाण करणाऱ्या व सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा शासनाकडून मिळालेले आहेत. त्यानुसार पालिकेने अनुदान लाटूनही शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हे दाखल करविले आहेत, तसेच गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून लोटाधारींची वरात ही काढलेली आहे. एवढे करूनही लोटाधारी सुधरायला तयार नाहीत. अजूनही शहरातील विविध भागात अनेकजण रोज सकाळी लोटा घेऊन बाहेर जाताना दिसतात. या भागात करण्यात आली पाहणीस्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने खामगाव शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न नगर पालिकेकडून होत आहे; मात्र शहरातील बाळापूर फ ैल, शिवाजी नगर परिसर, नवाफैल, चांदमारी, धोबी खदान, शंकर नगर, किसन नगर आदी भागातील मैदानांवर पाहणी केली असता अनेक लोटाधारी उघड्यावर जात असून, संबंधित परिसर अद्याप हगणदरीमुक्त झालाच नसल्याचे दिसून आले. भाजी मार्केटची दुरवस्था कायमचशंकर नगर भागातील नवनिर्मित घरकुलांमधील भाजी मार्केटलाही हगणदरीचे स्वरूप आलेले असून, यासंदर्भात ‘लोकमत’ने याअगोदर स्टिंग आॅपरेशन केले होते. नव्याने बांधलेल्या भाजी मार्केटचा वापर लोक शौचालयासारखा करीत असल्याने या ठिकाणी प्रचंड घाण झालेली आहे; पण हा प्रकार उघडकीस आणूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे येथील हगणदरी अद्याप कायम आहे.