शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दुरुस्ती केलेल्या कालव्यातून पाझरतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST

हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनाॅल फुटल्यानंतर त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यातून पाणी पाझरत असल्याने शेतकऱ्यांचे ...

हिवरा आश्रम : पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनाॅल फुटल्यानंतर त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यातून पाणी पाझरत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी १० दिवसांच्या वर साेडू नये, अशी मागणी रायपूर येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

पेनटाकळी ते सावत्रा येथील शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी पाझरू लागले आहे. या प्रकल्पामुळे १ ते ११ किमीपर्यंतच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी खारवटण्याची भीती निर्माण झाली आहे. जमिनीची पोत खराब होत आहे. या प्रकल्पातून १० दिवसांच्या वर पाणी सोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रायपूर येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर शालिग्राम काळे, काशीनाथ वाहेकर, गजानन काळे, अमोल वाहेकर, कृष्णा वाहेकर, साहेबराव वाहेकर, विजय वाहेकर, दशरथ वाहेकर, वसुदेव थुट्टे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

१० दिवसांच्या वर पाणी सोडू नये.

दहा दिवसांनंतर जर सतत पाणी सुरू राहिले तर आतून जमिनी पाझरतात व अतोनात नुकसान होते. हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

बबन वाहेकर, शेतकरी.

कायमस्वरूपी उपाययोजना करा

अनेक कामे अर्धवट राहिलेली असून ती कामे अगोदर पूर्ण करा व नंतर पाणी सोडावे. १ ते ११ किमी पाणी पाइपलाइनद्वारे नेण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करावा तरच परिसरातील शेतकरी समाधानी होईल.

वसुदेव थुट्टे, शेतकरी, रायपूर.