शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीक नुकसानाची मदत मिळण्याच्या 'आशेवर पाणी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:29 IST

Agriculture News, Buldhana Farmer पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मूग, उडिदाचे पीक अज्ञात रोगाने हातचे गेले. काही प्रमाणात आलेले पीक अतिपावसामुळे मातीत गेले. तरीही त्यानंतर जिल्ह्यातील पिकांची पैसेवारी ६८ निश्चित झाल्याने आता त्या पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.चालू हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या. तसेच सप्टेंबरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. या पावसामुळे घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने केले. त्यानंतर महसूल विभागाने जाहिर केलेल्या पैसेवारीमुळे त्या पीक नुकसानीची मदत मिळेल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रशासनाने जाहीर केल्यानुसार बुलडाणा तालुक्याची पैसेवारी ७४, चिखली-७१, देऊळगाव राजा-६८, मेहकर-७२, लोणार-६२, सिंदखेड राजा-६४, मलकापूर-६४, मोताळा-७१, नांदुरा-७१, खामगाव-६९, शेगाव-६५, जळगाव जामोद-६२, संग्रामपूर-७० या प्रमाणे नजर अंदाज जाहिर झाला आहे.

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती