शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

शासकीय कार्यालयातील पाणी धोकादायक

By admin | Updated: November 7, 2014 23:26 IST

दिव्याखाली अंधार : कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार.

बुलडाणा : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत सर्वच शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शहरातील शासकीय कार्यालय पाणी असतानाही कर्मचारी तहानलेले असल्याचे भासते. शिवाय प्रत्येक कार्यालयात असलेल्या पाण्याच्या टाक्या व नळाच्या तोट्या अस्वच्छ असल्यामुळे येथील कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप आहे. अभियान अधिक गतिमान होण्याची गरज असल्यामुळे या अभियानाला प्रारंभापासूनच शासकीय लेबल चिटकली, जिल्ह्यातील बर्‍याच शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांनी फोटो काढून हे अभियान सुरू केले; मात्र स्वच्छ अभियान बुलडाणा शहरात शासनाच्या दिव्याखाली अंधार ठरत आहे. अनेक ठिकाणी फोटोपुरते अभियान राबविले गेले. दुसर्‍या दिवशी परिस्थिती जैसे थे दिसत आहे. आपल्या विविध कामांसाठी जिल्ह्याभरातून नागरिक शासकीय कार्यालयात येतात. शासकीय कार्यालयात परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे श्‍वास गुदमरतो. तर येथे पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि अस्वच्छ असल्यामुळे त्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लाग त आहे. शिवाय कार्यालयातील कर्मचारी, अधिकार्‍यांनाही या कृत्रिम पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक कार्यालयात कर्मचार्‍यांनी वैयक्तिक खर्चा तून पाण्याची व्यवस्था केली असल्याचे आढळून आले.