शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 6, 2023 18:50 IST

शेतजमीनी पाण्याखाली : वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस

किनगाव जट्टू : परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले खळखळून वाहिले. कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्याने तलावाचे स्वरूप आले होते. नारळी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने दोन तास रहदारी खोळंबली होती. नारळी नदीच्या पुलावरून पाणी जात असताना एकमेकांचा हात धरून काहींनी जीवघेणा प्रवास केला. तर काही शेतकऱ्यांनी या वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस केले.

बळीराजा जोरदार पावसाची वाट पाहत असताना बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान अडीच तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरूवारी सुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे कित्येक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतीबांध फुटल्याने शेताला तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक वाचवण्याकरिता ठिंबक सिंचनाचा आधार घेत पाणी देणे सुरू केले होते. त्यांचे ठिंबक सिंचन एका ठिकाणी जमा झाले.

परिसरातील वसंत नगर, देवा नगर, खापरखेड लाड, सावरगाव तेली परिसरातील नदी नाले दुथडी भरून खळखळून वाहिले. किनगाव जट्टू गावाजवळी खापरखेड लाड रस्त्यावरील नारळी नदीवरील फुल पाण्याखाली आल्यामुळे दोन तास रहदारी खोळंबली होती. पुलावरून पुराचे पाणी असल्याने शेतकरी शेतमजूर अडकले होते. किनगाव जट्टूचा बाजार असल्याने अचानक पाऊस आल्यामुळे व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

खापरखेड येथील नागरिकांना जाण्याकरता पुलावरून पाणी असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. या पुलाची उंची वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. उशिरा का होईना जोरदार पाऊस आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.