शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 6, 2023 18:50 IST

शेतजमीनी पाण्याखाली : वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस

किनगाव जट्टू : परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले खळखळून वाहिले. कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्याने तलावाचे स्वरूप आले होते. नारळी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने दोन तास रहदारी खोळंबली होती. नारळी नदीच्या पुलावरून पाणी जात असताना एकमेकांचा हात धरून काहींनी जीवघेणा प्रवास केला. तर काही शेतकऱ्यांनी या वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस केले.

बळीराजा जोरदार पावसाची वाट पाहत असताना बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान अडीच तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरूवारी सुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे कित्येक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतीबांध फुटल्याने शेताला तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक वाचवण्याकरिता ठिंबक सिंचनाचा आधार घेत पाणी देणे सुरू केले होते. त्यांचे ठिंबक सिंचन एका ठिकाणी जमा झाले.

परिसरातील वसंत नगर, देवा नगर, खापरखेड लाड, सावरगाव तेली परिसरातील नदी नाले दुथडी भरून खळखळून वाहिले. किनगाव जट्टू गावाजवळी खापरखेड लाड रस्त्यावरील नारळी नदीवरील फुल पाण्याखाली आल्यामुळे दोन तास रहदारी खोळंबली होती. पुलावरून पुराचे पाणी असल्याने शेतकरी शेतमजूर अडकले होते. किनगाव जट्टूचा बाजार असल्याने अचानक पाऊस आल्यामुळे व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

खापरखेड येथील नागरिकांना जाण्याकरता पुलावरून पाणी असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. या पुलाची उंची वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. उशिरा का होईना जोरदार पाऊस आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.