शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धरणातून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: August 11, 2015 00:06 IST

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा धरणाचे गेट नादुरुस्त.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): ग्राम धानोरा आणि सुलज या दोन गावांना पाणी पुरवठा करणार्‍या धानोरा धरणाचे गेट नादुरूस्त असल्याने गेल्या १0 दिवसापासून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याचा नाहक अपव्यय होत असून यामुळे भविष्यात धानोरा व परिसरातील शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी धानोरा धरण असून या धरणामुळे अंदाजे २0 हेक्टर जमीनीला सिंचनाची व्यवस्था होवून बाजुच्या गावांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी या धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असतात. अशा परिस्थितीत केवळ धरणाचे पाणी सोडण्याचे गेट बिघडले असून संबंधित लघु पाटबंधारे विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष दिसते. उन्हाळ्यात या गेट दुरूस्तीसाठी एका एजन्सीला काम दिल्या गेले. मात्र तरीही ते दुरूस्त झाले नाही. उलट भर उन्हाळ्यात में महिन्यात सदर दरवाजा तोडण्यात आला. त्यामुळे तब्बल आठ दिवस धरणातील सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे धानोरा आणि सुलजमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाळ्यापुर्वी सदर गेट पुर्ववत दुरूस्त करणे आवश्यक असतानाही ती कार्यवाही सदर यंत्रणेकडून गेल्या गेली नाही. त्याचा परिणाम म्हणजे परिसरात गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला आणि धरणे तुडुंब भरली हे धरणातही भरपूर पाणीसाठा चोही बाजुने आला. परंतु गेट नादुरूस्त असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धानोरा वासियांमध्ये संबंधित यंत्रणेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.