शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:47 IST

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला.

-नविन मोदे

धामणगाव बढे : जलसंधारणासाठी देशभरात गाजलेली स्पर्धा म्हणजे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. या स्पर्धेला ८ एप्रिल रोजी राज्यभरात सुरूवात झाली. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. मोताळा तालुक्यातील १३२ गावांचा दुष्काळा विरूद्ध सध्या संघर्ष सुरू आहे.४५ दिवस चालणाºया या स्पर्धेदरम्यान गावातील दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार गावकºयांनी केला व ८ एप्रिलच्या पहिल्या सेकंदापासून श्रमदान प्रारंभ केले. त्यासाठी पोफळी येथील सुमारे ४०० अबालवृध्द, महिला, पुरूष व तरूणाई सहभागी झाली. गावकºयांच्या एकी व नेकीच्या बळावर कसा चमत्कार होवू शकतो हे सिंदखेड गावाने राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारत यापुर्वी सिध्द  केले आहे. आता असाच चमत्कार पोफळी येथे घडणार असून गावकºयांच्या भितीने व जिद्दीपुढे दुष्काळ वेशीवर आला आहे. पुढील ४५ दिवसात त्याला हद्दपार व्हावेच लागेल, असे यावेळी विस्तार अधिकारी दीपक माडीवाले यांनी सांगितले. गावकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी रात्री १२ वाजता हजर राहत त्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. पोफळी वासियांनी प्रशिक्षण, अभ्यासदौरे, आगपेटीमुक्त शिवार, माती परिक्षण, नर्सरी, पाणी बचत तंत्रज्ञान, प्रत्येक घराजवळ शोषखड्डे यासारखी पुर्वतयारी याअगोदरच पुर्ण केली. पोफळी येथे ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता औपचारिक उद्घाटनानंतर प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला. दुष्काळाला कायमस्वरूपी हद्दपार करून गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यासाठी गावकरी, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग व तालुका प्रशासन एकवटले आहे. युवा उद्योजक नीलेश व्यवहारे, रावसाहेब देशमुख, दगडु सुरडकर यांचे मार्गदर्शनात काटेकोर नियोजन, युवकांचा प्रचंड प्रतिसाद, महिलांचा मोठा सहभाग आणि प्रशासनाची साथ यामुळे पोफळीमध्ये ‘तुफान आलया’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशन कामावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहे. गावातील उच्चशिक्षित तरूण राहुल व्यवहारे यांनी मागिलवर्षी अंबेजोगाई येथे पाणी फाऊंडेशनमध्ये काम केले. तेथील अनुभव देखिल गावकºयांना कामी येत आहे.  .मोताळा तालुक्यातील १३ गावांनी वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून तेथे प्रत्यक्ष श्रमदानात गावकरी सहभागी झाले आहे. त्यामध्ये पोफळी, सिंदखेड, लपाली, पान्हेरा, उºहा, खामखेड, उबाळखेड, जयपूर, कोथळी, राजूर, पुनई, शेलापूर या गावांचा समावेश आहे.  दुष्काळाविरूध्द गावकरी एकत्र आले. एकी व नेकीच्या बळावर गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होवू.- नीलेश व्यवहारेउद्योजक, पोफळी

 दुष्काळाविरूध्द गावकºयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. गावकºयांच्या मदतीला प्रशासन सज्ज असून शक्य तेव्हा गावकºयांसोबत श्रमदानात सहभागी होवू.-दीपक माडीवालेविस्तार अधिकारी, पंचायत समिती, मोताळा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा