शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:26 IST

जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला  गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे.

- जयदेव वानखडे जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला  गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे.बुलढाणा जिल्हा मधून  जळगाव जामोद  संग्रामपूर आणि मोताळा  या तीन तालुक्यांची  वॉटर कप स्पर्धेमध्ये  पुन्हा निवड झाली असून  या तालुक्यांमध्ये  श्रमदानाचे  तुफान येऊ लागले आहे.  जळगाव जामोद तालुक्यातील  बांडापिंपळ, सूनगाव, खेळलोण, जामोद, राजुरा,पळशी सुपो, काजेगाव, पळसखेड, निंबोरा बु., निंभोरा खु., वडगाव, पाटण, कुरणगाड खु., टाकळी खाती, आसलगाव इत्यादी गावांसह जवळपास तीस गावांनी  सात एप्रिल च्या मध्यरात्री श्रमदान केले. अगोदरच  स्पर्धेच्या  नादाने झपाटलेले हे लोक रात्री चे केव्हा १२ वाजतात आणि स्पधेर्ला केव्हा सुरुवात होते याची आतुरतेने वाट बघत होते. यापैकी बहुतांश गावातून लोकांनी हातात कुदळ फावडे टिकास घेऊन मशाल रॅली काढली तर,आदिवासी बांडा पिंपळ राजुरा भिंगारा इत्यादी गावात पारंपरिक पद्धतीने ढोल,ताशे वाजवून मिरवणूक काढण्यात आली.या दुष्काळ रुपी राक्षसाला कायमचा हद्दपार करण्यासाठी गावकºयांनी त्याच्यावर घणाघाती वार केले.सध्या राजकीय वातावरण तापले असल्यावर सुद्धा गावकरी यांचा उत्साह कमी न होता वाढतच आहे.लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता यंदा वॉटर कप स्पधेर्चे प्रथम बक्षीस  जळगाव जामोद तालुक्याला मिळेल आणि तालुका हा दुष्काळमुक्त होईल. असे एकंदरीत चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी अशाच पद्धतीने गाव पाणीदार करण्याच्या हेतूने गावातील लहान बालके मुले युवक महिला पुरुष वृद्धांपर्यंत सर्व एकत्र आले आणि गावागावात श्रमदान झाले त्याचेच लोन यावर्षी तालुक्यामध्ये पसरले असून यंदा तर संपूर्ण तालुका दुष्काळमुक्त करू अशा निश्चयाने वॉटर कप स्पर्धेतील गावे कामाला लागली आहेत.गेल्या दोन महिन्यापासून गावागावात सभा घेऊन वाटर कप स्पधेर्साठी गावातील लोकांना तयार करण्याचे काम तालुका समन्वयक जिल्हा समन्वयक तथा जल योद्ध्यांनी यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या गावातील तरुण तरुणी आदिवासी यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये स्वत:ला झोकून दिले आहे. मागील वर्षी वनविभागाच्या परिसरात काम करताना आलेली अडचण पाहता यावर्षी रीतसर जल व मृद संधारणाच्या कामा करिता वनविभागाची परवानगी घेऊन वॉटर कप स्पधेर्चा ची कामे सुरू झाली आहेत. एप्रिल चा महिना कडक उन्हाळा असूनही दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावागावात चमू तयार झाले असून भर उन्हात श्रम करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJalgaon Jamodजळगाव जामोद