शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
2
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
3
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
5
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
6
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
7
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
8
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
9
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
10
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
11
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
12
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
13
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
14
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
15
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
16
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
17
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
18
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
19
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 15, 2017 00:36 IST

नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गुराढोरांसह नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत पाणीपुरवठ्याच्या विहिरीला पुरेसे पाणी होते. तेव्हा लाइनचा पुरवठा होत नसल्याने व सतत बिघाडाने पाणीटंचाई होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन नांद्रा गावाकडून लाइन जोडून देण्याची विनंती केली होती, ज्यामुळे जास्त विद्युत पुरवठा होऊन सतत होणाऱ्या विद्युत बिघाडावर लक्ष देणे सोपे होत होते. यावर तहसीलदार यांनी महावितरणला पत्र दिले व ही जोडणी न केल्यास यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला व समस्येला आपण जबाबदार राहाल, असे बजावले होते. तहसीलदाराच्या या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखवत कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी नांद्रावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामपंचायतने २००० फूट शेतकऱ्याचा केबल वायर टाकून विद्युतची व्यवस्था केली; परंतु तोपर्यंत विहिरीचे पाणी कमी झाले. या अगोदर नांद्रा येथील पाणीटंचाईबाबत संबंधितांचे लक्ष वेधले असता, लोणार तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन विहिरीची खोली वाढविण्याचा सल्ला दिला. अगोदर विद्युतअभावी तर आता पाण्याअभावी गावात पाणीटंचाई कायम आहे.