शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 15, 2017 00:36 IST

नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गुराढोरांसह नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत पाणीपुरवठ्याच्या विहिरीला पुरेसे पाणी होते. तेव्हा लाइनचा पुरवठा होत नसल्याने व सतत बिघाडाने पाणीटंचाई होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन नांद्रा गावाकडून लाइन जोडून देण्याची विनंती केली होती, ज्यामुळे जास्त विद्युत पुरवठा होऊन सतत होणाऱ्या विद्युत बिघाडावर लक्ष देणे सोपे होत होते. यावर तहसीलदार यांनी महावितरणला पत्र दिले व ही जोडणी न केल्यास यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला व समस्येला आपण जबाबदार राहाल, असे बजावले होते. तहसीलदाराच्या या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखवत कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी नांद्रावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामपंचायतने २००० फूट शेतकऱ्याचा केबल वायर टाकून विद्युतची व्यवस्था केली; परंतु तोपर्यंत विहिरीचे पाणी कमी झाले. या अगोदर नांद्रा येथील पाणीटंचाईबाबत संबंधितांचे लक्ष वेधले असता, लोणार तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन विहिरीची खोली वाढविण्याचा सल्ला दिला. अगोदर विद्युतअभावी तर आता पाण्याअभावी गावात पाणीटंचाई कायम आहे.