शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीची नळयोजना असूनही पाण्यासाठी भटकंती!

By admin | Updated: May 22, 2017 00:39 IST

महिला करणार पाण्याच्या टाकीवर उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : येथून साधारण १० कि.मी. अंतरावर असलेल्या दुधा या गावात गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून सार्वजनिक नळयोजना बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्याचे तीव्र टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. गावात एक कोटी रुपये खर्चून जलस्वराज्यची योजना सुरू करण्यात आली असली, तरी गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात दुधा येथील महिलांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेची नळ योजना पूर्ववत सुरू करून चौकशीची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की साधारण दोन वर्षांपूर्वी दुधा गावाकरिता जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. यामध्ये ढालसावंगी तलावातून गावासाठी पाणी आणल्या गेले. साधारण वर्षभर या योजनेचे पाणी दुधा ग्रामस्थांना मिळत होते. मात्र, मध्येच ही नळयोजना बंद पडल्याने महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रा.पं.ला विचारणा केली; परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या योजनेचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ही योजना ग्रा.पं.ने हस्तांतरित करून घेतली नाही. परिणामी ती बंद पडली. या संदर्भात प्रकल्पच्यावतीने राजगुरू यांनी माहिती दिली, की सदर प्रकल्प योजनेचे काम हे प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र दोन वर्षे झाली ग्रा.पं. प्रशासनाने ही योजना हस्तांतरित करून घेतली नाही. त्यामुळे शासनाच्यावतीने जास्त वेळ ही योजना सुरू राहू शकत नाही. ग्रा.पं. प्रशासनाने ही योजना हस्तांतरित करणे गरजेचे आहे.जलस्वराज्य योजनेत नागरिकांना कंत्राटदार आणि ग्रा.पं. प्रशासन यांचे अडेल धोरणामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी २२ मे पर्यंत पाणीपुरवठा नळयोजना पूर्ववत सुरू न झाल्यास महिलांच्यावतीने पाण्याचे टाकीवर बसून उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अनसूया वाघमारे, लीला शेलार, सरला सोनुने, शोभा सुरडकर, छाया कुसळकर, संगीता कुसळकर, अलका सोनुने, संगीता सोनुने यांच्यासह ५० महिलांच्या सह्या आहेत. जलस्वराज्य प्रकल्पांचे काम हे निकषानुसार झाले असून, कुठलीच त्रुटी नाही. ग्रा.पं. प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून ही योजना हस्तांतरित करून घेतली नाही. - शेखर मराठे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जलस्वराज्य प्रकल्पातील नळयोजनेची पाइपलाइन ३५ ते ४० ठिकाणी फुटलेली असून, विस्तारित भागात जलवाहिन्या टाकल्या गेल्या नाही. यात त्रुटी असल्याने हस्तांतरित केल्या गेली नाही.- कावेराबाई सोनुने, सरपंच, दुधा