शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

वान व पुर्णा या नद्याही कोरड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:35 IST

पातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्‍यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

ठळक मुद्देपिकांची वाढ खुंटली पेरणीनंतर दमदार पाऊसच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्‍यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. भरपूर पावसाच्या लपंडावाने किटकांचा प्रादुर्भाव सुध्दा दिसून येत असून पिकांवर पाने कुरतडणारे किड्यांचे आक्रमण झाले आहे. शेतकर्‍यांना दमदार पावसाची आशा लागुन आहे. मात्र परिणामकारक पाऊस पडत नसल्याने यंदा शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे शेत शिवारातील चित्र आहे. जून महिन्यात १६0 मिमी तर जुलै महिन्यात केवळ ८0 मिमी पावसाची येथील पर्जन्यमापक यंत्राची नोंद आहे. अत्यल्प पावसात पिके कशीबशी तग धरून आहेत. अशातच कोरड्या वातावरणामुळे पिके वाढू शकली नाहीत. मुग व उडीद व सोयाबीन हे पिक सध्या फळधारणेवर आहे. ऐन याच वेळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी पिकांना पाणी देवून संगोपन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

श्रावणाची झडी ची अपेक्षाच श्रावण महिना अत्यंत पावसाचा असतो यातील १0 दिवस निघून गेल्याने श्रावणाच्या श्रडीची यावर्षी प्रतीक्षाच बनुन राहिली. वान धरणाच्या पाणलोट क्षेत्रालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच पूर्णा ही सुध्दा परिसरातील मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. या नदीकाठी मोठा पूर गेला नाही व ऑगस्ट  महिन्यात पूर्णा नदी रौद्रय रूप धारण करते यावर्षी पूर्णा नदीला सुध्दा बेताचेच पाणी वाहिले.

पिक विमाबद्दल शेतकरी व्दिधा स्थितीतपरिसरात यावर्षी कमी पर्जन्यमान असून पिकांची परिस्थिती फारसी समाधानकारक नाही. असे असले तरीही पिक विम्याबद्दल शेतकरी व्दिधा मनस्थितीत आहे. गेल्या वर्षी शासनाने तूर पिकविण्याचे आवाहन केले . मात्र शासकीय खरेदी पाच हजार तर खाजगी व्यापार्‍यांकडे   केवळ तीन हजार रूपये भाव मिळाला तसेच सोयाबीनला सुध्दा कमी भाव मिळाला. पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शासकीय आवाहनाबद्दल शेतकर्‍यांमध्ये अनास्था आहे. तसेच गेल्या वर्षी पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी पिक विमा काढण्याबद्दल व्दिधा स्थितीत आहेत. पिक विमा काढण्याची तारीख वाढली मात्र शासकीय धोरण निश्‍चित नसल्याने शेतकर्‍यांचा उत्साह मात्र वाढला नाही, असे चित्र आहे.