शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पाऊले चालती... स्वच्छतेची वाट!

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

एक दशकपासून ‘तरुणाई’ची स्वच्छता वारी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा वसा जोपासण्याचा अनोखा प्रयत्न खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून केल्या जात आहे. स्वच्छता वारीच्या या उपक्रमाची आता विविध सामाजिक संस्थांकडूनही दखल घेतल्या जात आहे.संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगाव शहरात आगमन होत असून, मंगळवारी ही पालखी शेगाव येथे जाणार आहे. या पालखीदरम्यान, वारकऱ्यांना अन्नदान, आणि फराळाचे साहित्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, यासाठी प्लास्टिक आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याने, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचायचा. हा कचरा साफ करण्यासाठी खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने सर्वप्रथम सन २००६ साली सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावरील केळीच्या साली, प्लास्टिक द्रोण, पत्रवाळ्यांचा कचरा तरुणाईने साफ करण्यासाठी स्वच्छता वारी सुरू केली. या स्वच्छता वारीला येत्या मंगळवारी दहा वर्ष पूर्ण होणार असून, संत गजानन विजय गं्रथातील पहिल्या अध्यायातील ‘ शीत पडल्या दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालित। हें करण्याचा हाच हेतू ।‘अन्न परब्रम्ह’ कळवायाया’ या ओवीतून संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व जाणा, असा संदेश दिला आहे.हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तसेच दिंडी मार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाईचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सामाजिक संस्थांकडूनही दखल!तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून १६ किमी मार्गावरील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येते. या उपक्रमामुळे स्वच्छ अभियानाला हातभार लागणार असून, या उपक्रमात मलकापूरचे संत गाडगेबाबा विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव, बोथा फॉरेस्ट तरुणाई, आर्ट आॅफ लिव्हिंग, हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघ, एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय, सामाजिक वनीकरण विभाग यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी या उपक्रमापासून प्रेरणा घेतली आहे. दिंडी मार्गावरील कचरा निर्मूलनासह, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात इतर संस्थांचेही सहकार्य लाभते.- नारायण पिठोरेअध्यक्ष, तरुणाई फाउंडेशन, खामगाव.