शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाऊले चालती... स्वच्छतेची वाट!

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

एक दशकपासून ‘तरुणाई’ची स्वच्छता वारी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा वसा जोपासण्याचा अनोखा प्रयत्न खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून केल्या जात आहे. स्वच्छता वारीच्या या उपक्रमाची आता विविध सामाजिक संस्थांकडूनही दखल घेतल्या जात आहे.संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगाव शहरात आगमन होत असून, मंगळवारी ही पालखी शेगाव येथे जाणार आहे. या पालखीदरम्यान, वारकऱ्यांना अन्नदान, आणि फराळाचे साहित्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, यासाठी प्लास्टिक आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याने, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचायचा. हा कचरा साफ करण्यासाठी खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने सर्वप्रथम सन २००६ साली सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावरील केळीच्या साली, प्लास्टिक द्रोण, पत्रवाळ्यांचा कचरा तरुणाईने साफ करण्यासाठी स्वच्छता वारी सुरू केली. या स्वच्छता वारीला येत्या मंगळवारी दहा वर्ष पूर्ण होणार असून, संत गजानन विजय गं्रथातील पहिल्या अध्यायातील ‘ शीत पडल्या दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालित। हें करण्याचा हाच हेतू ।‘अन्न परब्रम्ह’ कळवायाया’ या ओवीतून संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व जाणा, असा संदेश दिला आहे.हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तसेच दिंडी मार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाईचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सामाजिक संस्थांकडूनही दखल!तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून १६ किमी मार्गावरील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येते. या उपक्रमामुळे स्वच्छ अभियानाला हातभार लागणार असून, या उपक्रमात मलकापूरचे संत गाडगेबाबा विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव, बोथा फॉरेस्ट तरुणाई, आर्ट आॅफ लिव्हिंग, हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघ, एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय, सामाजिक वनीकरण विभाग यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी या उपक्रमापासून प्रेरणा घेतली आहे. दिंडी मार्गावरील कचरा निर्मूलनासह, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात इतर संस्थांचेही सहकार्य लाभते.- नारायण पिठोरेअध्यक्ष, तरुणाई फाउंडेशन, खामगाव.