शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

ज्ञानगंगात स्थिरावलेल्या  ‘वॉकर’ वाघाचा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:11 IST

The ‘walker’ tiger settled in Gyanganga was not found : वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दीड वर्षापूर्वी ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेल्या ‘टी१सी१’ वाघ अर्थात ‘वॉकर’ सध्या अभयारण्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रसंगी तो अंबाबरवा किंवा अजिंठा पर्वत रांगांमध्ये गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे.मेळघाटातून बोरीवलीतील अभयारण्यात गेलेल्या एका बिबट्याच्या नंतर सर्वाधिक भटकंती केलेला वाघ म्हणून ‘टी१सी१’कडे पाहिले जात होते. लॉग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगरर्स उपक्रमांतर्गत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र वन विभागाच्या अर्थसाहाय्यातून वाघांचा करण्यात येणाऱ्या अभ्यासांतर्गत ‘वॉकर’वर नजर ठेवल्या जात होती. ज्ञानगंगा अभयारण्यात तो बराच काळ स्थिरावला होता. त्याच्या वास्तव्यामुळे ‘ज्ञानगंगा’चे भाग्यही उजळले होते.मात्र जवळपास गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये या वाघाचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे अभयारण्य सोडून हा ‘वॉकर’ अन्यत्र तर गेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाही म्हणायला या वॉकरच्या गळ्यात रेडिओ कॉलर आयडीही लावलेली होती. त्याची बॅटरी डाऊन झाल्याने नंतर ती काढून घेण्यात आली होती. त्यामुळे त्याचे निश्चित ठिकाण वनविभागालाही शोधणे कठीण झाले आहे. याबाबत वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रसंगी ‘वॉकर’ अंबाबरवा अभयारण्य किंवा जळगाव खान्देशमधील भवानी अभयारण्य किंवा अजिंठा पर्वत रागांमध्ये गेला असल्याचा कयास नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त करण्यात आला.

वाघाच्या मेटिंगसाठीही प्रयत्नअगदी खासदार प्रतापराव जाधव यांनी वयात आलेल्या या वाघाला मेटिंगसाठी ज्ञानगंगात वाघीण सोडण्याचीही मागणी केली होती. पत्रव्यवहाराचा सोपस्कारही पार पडला होता. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटनेही त्यास सहमती दर्शवली होती. त्यासाठीची बैठक कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलावी लागली होती. आता तर वॉकरचा शोध घेण्याची वेळ आली आहे.  त्यातच वर्षातून दोनदा होणाऱ्या व्याघ्र संवर्धनाच्या बैठकांचेही काय झाले, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. साधारणत: सहा महिन्यातून किमान एक बैठक होणे अपेक्षित असते.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यTigerवाघbuldhanaबुलडाणा