शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 10, 2014 23:33 IST

१0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत.

बुलडाणा : मृग नक्षत्राचा प्रारंभ ७ जून रोजी होतो. त्यामुळे पावसाळा अधिकृत सुरू झाला असे आपण म्हणतो. यावेळी मात्र पावसाचा अद्यापही पत्ता नाही. आज १0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत. आतापर्यंत ३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याही उलटण्याच्या स्थितीत असून, संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. दररोज आभाळ दाटून येते; पण पाऊस येत नसल्याने निराशेचेच ढग दाटून आले आहेत.गेल्यावर्षी १0 जुलैपर्यंत ३५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावेळी ३९ टक्केपर्यंत पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात १ ते २ वेळा पावसाने तुरळक हजेरी लावली; मात्र मोताळा तालुक्यात आतापर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. अवर्षणप्रणव म्हणून घोषित असलेल्या मोताळा तालुक्याची स्थिती सर्वाधिक बिकट अशी आहे. सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव या परिसरात झालेल्या धूळपेरण्या उलटण्याच्या मार्गावर असून, मान्सूनपूर्व लावलेली कपाशी फक्त ठिबकच्या भरोशावर तग धरून आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठाही खालवत चालला असून, तीन मोठय़ा प्रकल्पातील जलसाठा ४0 टक्क्यापर्यंत, तर ७ मध्यम प्रकल्पातील जलसाठा २७ टक्क्यापर्यंत उतरला आहे. आता पिण्याच्या पाण्याचेही संकट घोंगावत आहे.

** येत्या चार दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता

जळगाव जामोद : हवामानाच्या अंदाजानुसार येत्या ३/४ दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाई न करता १८ जुलैपर्यंत पेरणीचे नियोजन करावे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचे पेरणीचे नियोजन पार कोलमडले असून, जवळपास पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटल्याने खरीप हंगामाचे कसे होणार, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड कोरड्या दुष्काळाची चिन्हे दिसत असताना भारतीय हवामान खाते पुणे यांच्या अंदाजानुसार कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. अनिल गाभणे, प्रा. संजय उमाळे यांनी ११ ते १६ जुलै या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविल्याने त्याचा शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु उशिरा का होईना खरीप हंगामाशिवाय कोरडवाहू शेतकरी कशाच्या भरवशावर आपली उपजीविका करणार, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तीच-ती पिके पेरल्यास नुकसानही संभवू शकते म्हणून आता शेतकर्‍यांनी उडीद, मूग, ज्वारी आणि बी.टी. कपाशी बियाण्यांची पेरणी करू नये कारण खोडकिडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होते. त्याऐवजी शेतकर्‍यांनी लवकर येणार्‍या देशी व सरळ वाणाचा वापर पेरणीसाठी करावा. शिफारशीपेक्षा २0 टक्के बियाणे जास्त वापरून दोन ओळीतील अंतर कमी करुन झाडांची संख्या वाढविली पाहिजे. त्याचप्रमाणे मका, सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. जिल्ह्यात पावसाची हजेरी जिल्ह्यातील लोणार, सुलतानपूर व दुसरबीड परिसरात काल पावसाने तुरळक हजेरी लावली होती. आज मलकापूर, खामगाव, बुलडाणा परिसरात पाऊस झाला त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संध्याकाळी बुलडाणा शहर व परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्याने नवी उमेद निर्माण झाली आहे. दररोज ढग दाटून येतात; मात्र पाऊस येत नसल्याने जिल्हाभर निराशेचे ढग जमा झाले आहेत.