शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या ...

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या अवकाळी पावसाने अधिक भर घातली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. मदतीसाठी १ लाख ९५ हजार रुपयांची आवश्यकता आहे.

तालुक्यात मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पाऊस व वादळाने अनेक पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये वीज कोसळून व एका प्रकरणात गोठ्यास आग लागल्याने सात जणावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. मात्र, पात्र आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. कधी दुष्काळाची दहशत, कधी अतिपावसाची नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन या नैसर्गिक आपत्तीत हिरावले असून, यापोटी आवश्यक केवळ २ लाखांच्या आसपासचा निधी अद्याप स्थानिक प्रशासनास प्राप्त न झाल्याने आपत्तीग्रस्तांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या आपत्तीग्रस्तांबाबत स्थानिक महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र आपत्तीग्रस्त!

तालुक्यातील भोरसा येथे १६ एप्रिल रोजी कृष्णा मुरकुटे यांचा एक बैल, १९ मार्चला खंडाळा मं. येथील पांडुरंग ठेंग यांची गाय, २९ मे ला बोरगाव वसू येथील बिदेसिंग सुरडकर यांची गाय, ३० मे रोजी दिवठाणा येथील भगवान मोरे यांची म्हैस व २९ मे एप्रिलला अंत्री कोळी येथील नंदकिशोर वाघ यांच्या मालकीची वासरे अशी सहा जनावरे वीज कोसळून मृत झाले. धोत्रा भनगोजी येथील दगडू अक्कर यांच्या गोठ्यात २९ एप्रिलला आग लागून गाय व दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला.

केवळ पशुधानाची सात प्रकरणे पात्र!

यातील केवळ ७ प्रकरणे मदतीस पात्र ठरले. त्यामध्ये ३ बैलांसाठी ७५ हजार, तर ३ गायी व एक म्हशीसाठी १ लाख २० हजार असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर आपत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. तथापि, बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात बैलांची उणीव जाणवणार आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे असले तरी ते सध्याच्या घडीला मिळणे गरजेचे आहे.

विनायक सरनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.