शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या ...

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या अवकाळी पावसाने अधिक भर घातली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. मदतीसाठी १ लाख ९५ हजार रुपयांची आवश्यकता आहे.

तालुक्यात मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पाऊस व वादळाने अनेक पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये वीज कोसळून व एका प्रकरणात गोठ्यास आग लागल्याने सात जणावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. मात्र, पात्र आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. कधी दुष्काळाची दहशत, कधी अतिपावसाची नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन या नैसर्गिक आपत्तीत हिरावले असून, यापोटी आवश्यक केवळ २ लाखांच्या आसपासचा निधी अद्याप स्थानिक प्रशासनास प्राप्त न झाल्याने आपत्तीग्रस्तांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या आपत्तीग्रस्तांबाबत स्थानिक महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र आपत्तीग्रस्त!

तालुक्यातील भोरसा येथे १६ एप्रिल रोजी कृष्णा मुरकुटे यांचा एक बैल, १९ मार्चला खंडाळा मं. येथील पांडुरंग ठेंग यांची गाय, २९ मे ला बोरगाव वसू येथील बिदेसिंग सुरडकर यांची गाय, ३० मे रोजी दिवठाणा येथील भगवान मोरे यांची म्हैस व २९ मे एप्रिलला अंत्री कोळी येथील नंदकिशोर वाघ यांच्या मालकीची वासरे अशी सहा जनावरे वीज कोसळून मृत झाले. धोत्रा भनगोजी येथील दगडू अक्कर यांच्या गोठ्यात २९ एप्रिलला आग लागून गाय व दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला.

केवळ पशुधानाची सात प्रकरणे पात्र!

यातील केवळ ७ प्रकरणे मदतीस पात्र ठरले. त्यामध्ये ३ बैलांसाठी ७५ हजार, तर ३ गायी व एक म्हशीसाठी १ लाख २० हजार असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर आपत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. तथापि, बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात बैलांची उणीव जाणवणार आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे असले तरी ते सध्याच्या घडीला मिळणे गरजेचे आहे.

विनायक सरनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.