शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या ...

चिखली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम केले असतानाच गत मार्च महिन्यापासून अधून-मधून कोसळलेल्या अवकाळी पावसाने अधिक भर घातली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. मदतीसाठी १ लाख ९५ हजार रुपयांची आवश्यकता आहे.

तालुक्यात मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पाऊस व वादळाने अनेक पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये वीज कोसळून व एका प्रकरणात गोठ्यास आग लागल्याने सात जणावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. मात्र, पात्र आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. कधी दुष्काळाची दहशत, कधी अतिपावसाची नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याला सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन या नैसर्गिक आपत्तीत हिरावले असून, यापोटी आवश्यक केवळ २ लाखांच्या आसपासचा निधी अद्याप स्थानिक प्रशासनास प्राप्त न झाल्याने आपत्तीग्रस्तांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या आपत्तीग्रस्तांबाबत स्थानिक महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र आपत्तीग्रस्त!

तालुक्यातील भोरसा येथे १६ एप्रिल रोजी कृष्णा मुरकुटे यांचा एक बैल, १९ मार्चला खंडाळा मं. येथील पांडुरंग ठेंग यांची गाय, २९ मे ला बोरगाव वसू येथील बिदेसिंग सुरडकर यांची गाय, ३० मे रोजी दिवठाणा येथील भगवान मोरे यांची म्हैस व २९ मे एप्रिलला अंत्री कोळी येथील नंदकिशोर वाघ यांच्या मालकीची वासरे अशी सहा जनावरे वीज कोसळून मृत झाले. धोत्रा भनगोजी येथील दगडू अक्कर यांच्या गोठ्यात २९ एप्रिलला आग लागून गाय व दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला.

केवळ पशुधानाची सात प्रकरणे पात्र!

यातील केवळ ७ प्रकरणे मदतीस पात्र ठरले. त्यामध्ये ३ बैलांसाठी ७५ हजार, तर ३ गायी व एक म्हशीसाठी १ लाख २० हजार असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर आपत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. तथापि, बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात बैलांची उणीव जाणवणार आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे असले तरी ते सध्याच्या घडीला मिळणे गरजेचे आहे.

विनायक सरनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.