शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

शेतकर्‍यांना गतवर्षीच्या पीक विम्याची प्रतीक्षा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:11 IST

बुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. 

ठळक मुद्देबँकांमध्ये चकराधनादेश देण्यास होत आहे विलंब  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. शासनाच्यावतीने पीक विमा काढण्याचे शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा काढतात. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी १७ कोटी ९७ लाख रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. यामध्ये ३२ हजार ३६५ शेतकर्‍यांचा समावेश आहे. ही रक्कम आज मिळेल उद्या मिळेल, या आशेने शेतकरी  असलेल्या बँकेमध्ये चकरा मारत आहेत; मात्र त्यांच्या नशिबी उपेक्षाच येत आहे. विम्याच्या रकमेतून पीक कर्जाचा भरना करून कर्ज पुनर्गठनासाठी ही रक्कम उपयोगी पडली नाही. शेतीच्या रब्बीच्या हंगामातील पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी सन २0१५- १६ चा रब्बी हंगामाची गहू, हरभरा, करडई आदी पिकाचा पीक विमा हप्ता भरलेला होता; मात्र कमी पावसाअभावी पिके करपली. हरभरा पिकांचे बियाण्यांचा खर्चदेखील वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत रब्बी पीक विम्याचा शेतकर्‍यांना आधार होता; मात्र अजूनही शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही. शेतकरी अजूनही पीक विम्याच्या आशा धरून बसले आहेत. या कुंभकर्णी झोपेतील शासनाला अद्यापही जाग येत नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने सर्वच महसूल विभागाचा पीक विमा मंजूर केला होता. गह,ू हरभरा आदी पिकाच्या नुकसानीच्या हेक्टरी  रक्कम पाठवून दोन महिने झाले होते; पण शासनाच्या लालफितीत या विमा  नुकसान भरपाईची रक्कम बळीराजाच्या खात्यावर जमा झाली नाही.