शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:18 IST

Khamgaon News : तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना बँका नोटिसा पाठवत असल्याने तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.युती शासनाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. यामुळे या योजनेतून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. तर दुसरीकडे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता. यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश होता. शेतकरी कर्जमुक्त व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेतील प्रत्यक्ष नियम आणि अटींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजा कायम राहून पुन्हा कर्ज मिळण्यास अडचणी येत होत्या.गेल्या दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती. यातून जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले. याच दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान आणि दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँक, मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढत आहेत. यंदा कोरोनामुळे शेतमाल विक्रीत अडचणी आल्याने शेतकरी संकटात आहेत. यामुळे शासनाने केलेल्या दोन्ही घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी