शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:18 IST

Khamgaon News : तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना बँका नोटिसा पाठवत असल्याने तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.युती शासनाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. यामुळे या योजनेतून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. तर दुसरीकडे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता. यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश होता. शेतकरी कर्जमुक्त व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेतील प्रत्यक्ष नियम आणि अटींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजा कायम राहून पुन्हा कर्ज मिळण्यास अडचणी येत होत्या.गेल्या दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती. यातून जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले. याच दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान आणि दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँक, मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढत आहेत. यंदा कोरोनामुळे शेतमाल विक्रीत अडचणी आल्याने शेतकरी संकटात आहेत. यामुळे शासनाने केलेल्या दोन्ही घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी