शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या दिशानिर्देशाची बँक अधिकाऱ्यांना प्रतीक्षा!

By admin | Updated: June 15, 2017 00:46 IST

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दहा हजारांच्या मदतीबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : शासनाने कर्ज माफीची घोषणा केली असली, तरी अद्याप कर्जमाफी कुणाला व कशी द्यायची, याबाबत कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश आलेले नाहीत. सध्या पेरणीची लगबग असल्यामुळे शेतकरी बँकेत जाऊन नवीन पीक कर्जाची मागणी करीत आहेत. मात्र, बँकेचे अधिकारी दिशानिर्देशाचे कारण सांगून परत पाठवित असल्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत. शासनाने राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना रविवारी तत्काळ कर्जमाफी जाहीर करीत सोमवारपासून नवीन पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे घोषित केले. त्यामुळे शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत असून, बँकांची मात्र नकारघंटा कायम असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात शेतकरी आंदोलनाची धग वाढत असल्याचे पाहून सरकारने रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी जाहीर करीत दुसऱ्याच दिवशीपासून नवीन पीक कर्ज देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. पेरणीची वेळ तोंडावर आलेली असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा त्यांच्यासाठी नवसंजीवनी देणारी ठरली. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी संबंधित बँकांमध्ये जाऊन नवीन कर्जाविषयी विचारणा करीत आहेत. प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. मात्र, कर्जमाफी व नवीन वाटपाबाबत अद्याप कोणतेही लेखी आदेश बँकांना प्राप्त झालेले नसल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. बँकांकडून शेतकऱ्यांसमोर नकारघंटा वाजविली जात असल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये तत्काळ देण्याचे जाहीर केल्याने हे पैसे केव्हा मिळणार, अशी विचारणा शेतकरी बँकेकडे करीत आहेत. बँक अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढला नाही. दुसरीकडे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. त्यामुळे बँक अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, कुणालाही कोणत्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळे या बैठका निष्फळ ठरत आहेत. कर्जमाफीबाबत मात्र नियमित बैठका सुरू आहेत. यासोबतच शेतकऱ्यांना दहा हजारांची तत्काळ मदत मिळणार असल्याची घोषणा शासनाने केली. त्यामुळे शेतकरी बँकांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना दहा हजार रूपयांची मदत मागत आहेत. मात्र, अद्याप बँकेकडे याबाबत कोणताही अध्यादेश आला नसल्यामुळे अधिकारी पैसे देण्यास नकार देत आहेत.